संजय राऊतांना आलेल्या धमकीची चौकशी गांभीर्याने झाली पाहिजे ; नवनीत राणांची मागणी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- बहुचर्चित गुजरात विधानसभा आणि हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत काँग्रेसने हिमाचल प्रदेशमध्ये सत्तेत पुनरागमन केलं.
तर गुजरातमध्ये भाजपने सत्ता कायम राखत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. यावर बोलताना खासदार नवनीत राणा यांनी आज गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली.
यावेळी गुजरातमधील भाजपाच्या रेकॉर्डब्रेक विजयावर आणि काँग्रेसच्या कामगिरीवर म्हणाल्या की, गुजरातचा विजय हा नक्कीच मोदींना विजय आहे. कारण एखाद्या राज्यात अनेक वर्षे सत्ता राखणे सोपे नसते, काँग्रेस यामध्ये डुबताना दिसत आहे, काँग्रस जिथे पाहिजे तिथे काम करत नाही, मोकळ्यात भारत जोडो यात्रा काढलेली आहे.
जिथे भारत तुटलात नाही तिथे भारत कसा जोडणार, काँग्रेसने ज्या ठिकाणी पक्ष कमकुवत आहे. तिथे ताकतीने उभा राहिला पाहिजे. तर संजय राऊत यांना आलेल्या धमकीवर विचारलं असता राणा म्हणाल्या की, “संजय राऊत हे जेष्ठ नेते आहेत, त्यांना आलेल्या धमकीची चौकशी ही गांभीर्याने झाली पाहिजे, आणि मला विश्वास आहे की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याची गांभीर्याने कोणताही भेदभाव न करता चौकशी करतील. असं मत नवनीत राणा यांनी व्यक्त केलं.