‘जी-२०’ परिषदेला उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थितवरून टोला ; त्यांचे राज्यावरील बेगडी प्रेम….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- उद्धव ठाकरेंनाही निमंत्रण दिले होते. तरीही ते अनुपस्थित राहिले. विकास प्रकल्प, उद्योग या मुद्यांवरून आरोप-प्रत्यरोप करणारे उद्धव ठाकरे यांनी गैरहजर राहून काय सिद्ध केले?
हेच त्यांचे देशप्रेम आहे का? हेच राज्यावरील त्यांचे प्रेम आहे का? त्यांचे राज्यावरील बेगडी प्रेम त्यांच्या कृतीतून दिसले, अशा शब्दांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने सोमवारी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला देशातील सर्वच प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल , तेलंगणाचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यासारखे नेते उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही हजर होते. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आले नाहीत. दरम्यान, महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या नेत्यांसह संयुक्त पत्रकार परिषद घेत १७ डिसेंबर रोजी महामोर्चा काढण्याची घोषणा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील बैठकीला सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, उद्धव ठाकरे या बैठकीला अनुपस्थित होते. यावरून शिंदे यांनी ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरेंनाही निमंत्रण दिले होते. तरीही ते अनुपस्थित राहिले. विकास प्रकल्प, उद्योग या मुद्यांवरून आरोप-प्रत्यरोप करणारे उद्धव ठाकरे यांनी गैरहजर राहून काय सिद्ध केले? हेच त्यांचे देशप्रेम आहे का? हेच राज्यावरील त्यांचे प्रेम आहे का? त्यांचे राज्यावरील बेगडी प्रेम त्यांच्या कृतीतून दिसले, अशा शब्दांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
जी-२०चे यजमानपद देशाला मिळणे ही खरेतर गौरवाची बाब आहे, असेही शिंदे म्हणाले. तसेच, १७ डिसेंबरला मुंबईत जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा विराट मोर्चा काढण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. याबाबत या पक्षांना विराट मोर्चासाठी शुभेच्छा आहेत, असा टोला शिंदे यांनी लगावला.