देवेंद्र फडणवीसांची चौकशी करा, रवी जाधवांचा मुंबई सत्र न्यायालयात अर्ज….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर स्टॅम्प घोटाळा प्रकरणात चौकशी करा, अशी मागणी अँड.रवी जाधव यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे . मनी लॉड्रिंग प्रकरणातील आरोपी सतीश उके यांचे वकील रवी जाधव यांनी मुंबई सत्र न्यायालयात चौकशीच्या मागणीसाठी अर्ज केलाय. विशेष पीमएलए कोर्टाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी जाधव यांचा हा अर्ज स्वीकारला आहे.
नागपुरातील (Nagpur) वकील सतीश उके (Satish Uke) आणि त्यांच्या भावाने बनावट जमिनीची कागदपत्रे बनवून शहरातील जमीन हडप केल्याचा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने केला आहे. ईडीने ३१ मार्च २०२२ रोजी दोन्ही आरोपींना मनी लाँड्रिंग विरोधी कायद्यांतर्गत अटक केली होती. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अनेक वर्षांपासून याचिका दाखल करण्यासाठी हे वकील ओळखले जातात. ३१ मार्च २०२२ रोजी नागपूरच्या पार्वतीनगर भागातील वकिलाच्या निवासस्थानावर ईडीने छापा टाकल्यानंतर लगेचच त्यांना अटक करण्यात आली. ईडीने सांगितले की, भावांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा खटला नागपूर पोलिसांकडे (अजनी पोलिस स्टेशन) दाखल केलेल्या एफआयआरशी संबंधित आहे.
ईडीने सांगितले की, सतीश उके आणि प्रदीप उके यांच्याविरुद्ध पहिला पोलीस एफआयआर मोहम्मद जफर (Mohammad Zafar), मयत मोहम्मद समद यांच्या पुतण्याने दाखल केला होता, जो नागपुरातील मौजा बोखरा येथे पाच एकर जमिनीचा मालक होता. त्यांनी बनावट कागदपत्रे (forged documents) तयार करून जमीन ताब्यात घेतल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. दुसरा पोलीस एफआयआर ऐश्वर्या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सचिव शोभाराणी राजेंद्र नलोडे (Shobharani Rajendra Nalode) यांनी सतीश उके, प्रदीप उके आणि इतरांविरुद्ध दाखल केला असून, त्यांनी नागपूरच्या मौजा बाबुलखेडा येथील त्यांच्या सोसायटीच्या दीड एकर जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप केला आहे.