सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर उद्या होणार सुनावणी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अलीकडे महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादावर केलेल्या वक्तव्यानंतर हा वाद अजून चिघळला. त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्यात सीमावादावर शाब्दिक चकमक झाली होती.
तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बेंगळुरू-पुणे महामार्गावर जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं आहे. सध्या महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद प्रकरणाची सुनवाई सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. तत्पूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे आज दिल्ली दौरा करणार आहेत.
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील वादग्रस्त गावांतील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र सरकारच्या विरोधात केलेल आंदोलन हे महाराष्ट्र – कर्नाटक सीमा वाढण्याचे कारण ठरलं आहे. सीमाभागातील सांगली गावातील आंदोलक शेतकरी कर्नाटकात विलीन होण्याची मागणी करत असल्याचे सांगण्यात आले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले होते की जिल्ह्यातील गावांनी तीव्र जलसंकट अनुभवल्यानंतर कर्नाटकात विलीन होण्याची विनंती करणारा ठराव मंजूर केला. मुख्यमंत्र्यांच्या विधानाला उत्तर देताना फडणवीस यांनी सांगितलं की सीमेजवळील कोणत्याही गावाने असा ठराव केला नाही आणि कोणीही “कोठेही जात नाही.” तसेच कर्नाटक सरकारने सोलापूर, अक्कलकोट आणि जतमधील ४० गावांवर हक्क सांगितला असला तरी, एकही गाव कर्नाटकमध्ये जाऊ दिले जाणार नाही, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दिले आहे. सध्या महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद प्रकरणाची सुनवाई सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे आणि उद्या या प्रकारांची सुनवाई होणार आहे तर तत्पूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे आज दिल्ली दौरा करणार आहेत.
तर महाराष्ट्रात सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांची बैठक घेतली आहे. राज्य सरकारने मंत्री चंदक्रात पाटील व शंभूराज देसाई यांची समिती नेमली असून न्यायालयीन प्रक्रियेसंदर्भात समन्वय साधणार आहेत. तर आता सर्वांचे लक्ष्य उद्याच्या सुनावणीकडे लागलं आहे.