अकोल्यात पीक विमा न मिळाल्यामुळे शेतकरी संतप्त, पीक विमा कार्यालयाची केली तोडफोड.…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अकोला :- अकोला जिह्यात अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱयांना अजूनही पीक विमा मदत आणि महात्मा जोतिबा फुले प्रोत्साहन योजनेचे अनुदान न मिळाल्यामुळे संतापलेल्या शेतकरी आणि शिवसैनिकांनी आंदोलनानंतर पीक विमा कार्यालयाची तोडफोड केली.
शेतकऱयांना न्याय द्या नाही तर यापेक्षाही तीव्र पडसाद उमटतील, असा इशारा शेतकरी, शिवसैनिकांनी दिला आहे.
अतिवृष्टीमुळे अकोल्यातील हजारो हेक्टर जमिनीवरील पिके नष्ट झाली. शेतकऱयांची लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी करत शिवसेनेच्या वतीने आज 41 ठिकाणी आंदोलन करण्यात आले. ओला दुष्काळ जाहीर करा आणि हेक्टरी 25 हजार रुपये पीक विमा अग्रीम रक्कम शेतकऱयांच्या खात्यात जमा करा, अशी जोरदार मागणी केली. या आंदोलनादरम्यान शेतकऱयांनी आणि शिवसैनिकांनी रास्ता रोको केला. त्यानंतर थेट पीक विमा कार्यालयात घुसून कार्यालयाची तोडफोड करून आपला रोष व्यक्त केले.