राज ठाकरेंच्या मनसेच्या युतीची गरज नाही ; रामदास आठवलेंच्या वक्तव्याने खळबळ…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मागील काही दिवसांपासून शिंदे गट, भाजप आणि मनसे यांच्यांतील जवळीक वाढत आहे. शिवतीर्थावर झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तिन्ही एकाच मंचावर उपस्थित होते.
यामुळे नवी युती पहायाला मिळेल अशी चर्चा रंगली होती. त्यातचा मनसे आमदार राजू पाटील यांनी चर्चेला खतपाणी घालणारे वक्तव्य केले आहे. मात्र, केंद्रीय रामदास आठवले यांनी मनसे सोबतच्या युतीबाबत आश्चर्यकारक वक्तव्य केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे राज ठाकरे यांच्या कार्यक्रमाला गेले असले तरी राज ठाकरे NDA मध्ये येणार नाहीत असे रामदास आठवले म्हणाले.
आम्हाला तशी मनसेची आवश्यकता नाही आहे. मुंबई महापालिकेवर RPI, भाजप आणि शिंदे गटाचाच झेंडा फडकणार आहे. त्यामुळे राज ठाकरेंची आमच्या महायुतीमध्ये आवश्यकता नाही असे रामदास आठवले म्हणाले.
समीर वानखेडे यांनी घेतला रामदास आठवलेंची भेट
समीर वानखेडे यांनी घेतला रामदास आठवलेंची भेट घेतली. अन्याय झाला असल्याची समीर वानखेडे यांची भावना असल्याचे रामादास आठवले म्हणाले.