शेतकऱ्यांवर फक्त घोषणांचा पाऊस होतोय, मदत काहीच मिळत नाहीय :- बाळासाहेब थोरात…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- सरकारच्या या मदतीवर काँग्रेस नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी टिका केली आहे. शेतकऱ्यांवर फक्त घोषणांचा पाऊस होतोय, मात्र प्रत्यक्षात मदत काहीच मिळत नाहीय, अशी टिका बाळासाहेब थोरात यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.
काल औरंगाबाद येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दुष्काळाची पाहणी करताना, थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसानीची पाहणी केली.
महात्मा फुले कृषी कर्ज योजनेला सरकारने गुरुवारपासून सुरुवात केली आहे. प्रोत्साहानपर अनुदान म्हणून ५० हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने भरले आहे. एकूण राज्यातील सात लाध शेतकऱ्यांच्या खात्यात १५ हजार कोटी एवढी रक्कम सरकारने भरली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माहिती सांगितली आहे. मात्र अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे, त्यामुळं सरकारनं केलेली ही मदत तोकडी असून, सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत दिली पाहिजे असं विरोधकांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सरकारच्या या मदतीवर काँग्रेस नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी टिका केली आहे. शेतकऱ्यांवर फक्त घोषणांचा पाऊस होतोय, मात्र प्रत्यक्षात मदत काहीच मिळत नाहीय, अशी टिका बाळासाहेब थोरात यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे. काल औरंगाबाद येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दुष्काळाची पाहणी करताना, थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसानीची पाहणी केली. यानंतर त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत मिळाली पाहिजे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मात्र आज शेतकऱ्यांवर फक्त घोषणांचा पाऊस होतोय, मात्र प्रत्यक्षात मदत काहीच मिळत नाहीय, अशी टिका बाळासाहेब थोरात यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.