हिंगोली काँग्रेसमध्ये “ओक्के” नाही…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कळमनुरी :- पक्षांतर्गत असलेल्या नाराजी, नंतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत समेटासाठी झालेली फिसकटलेली बोलणी यामुळे माजी आमदार डॉ. संतोष टारफे लवकरच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊ शकतात, अशी चर्चा हिंगोली जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आहे.
त्यामुळे जिल्हा काँग्रेसमध्ये सगळे काही ओक्के नसल्याचे चित्र असून, तसे झाले तर तालुक्यात मोठी राजकीय उलथापालथ होऊन सर्व राजकीय समीकरणे बदलू शकतात.
काँग्रेस पक्षांतर्गत निर्णय प्रक्रियेत विश्वासात घेतले जात नसल्याचे सांगत एकतर्फी निर्णय घेतले जात असल्याच्या कारणावरून मागील काही दिवसांपासून माजी आमदार डॉ. टारफे हे पक्षांतर्गत घडामोडी व कार्यक्रमापासून चार हात लांब राहिले होते. त्यातच डॉ. टारफे काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या.
दरम्यान, पक्षांतर्गत असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी नुकतीच मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोकराव चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासोबत त्यांच्या भेटीगाठी व चर्चाही झाल्या. मात्र, यावेळी आमदार डॉ. प्रज्ञा सातव आणि माजी आमदार डॉ. टारफे यांच्यामध्ये समेट होऊ शकली नाही. पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केलेली मध्यस्ती निष्फळ ठरली आहे.
शिवसेना की भाजप?
डॉ. टारफे काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. डॉ. टारफे हे भाजप की शिवसेना यापैकी कुणाची निवड करतात हेही औत्सुक्याचे आहे. दरम्यान, दुसऱ्या बाजूला मागील अडीच वर्षाचा महाविकास आघाडीचा सरकारच्या कार्यकाळात शिवसेनेची भूमिका पाहता टारफे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश घ्यावा, असा आग्रह ही कार्यकर्त्यांनी लावून धरला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संतोष टारफे यांनी मतदार संघातील कार्यकर्त्यांशी बोलाचाली चर्चा सुरू केल्या आहेत सर्व कार्यकर्त्यांच्या बोलाचाली नंतरच पुढील राजकीय दिशा ठरवून व निर्णय घेण्याची तयारी चालवली आहे.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….