देशभक्तीपर नाऱ्यांनी दुमदुमले दिग्रस शहर ; क्रांतिकारक, देशभक्त, माजी सैनिकांच्या स्मृति स्थळांना अभिवादन ; सायकल, मोटर बाईक तिरंगा रॅलीला दिग्रसमध्ये मोठा प्रतिसाद ; सर्व पक्षीय, सर्व धर्मीय समाज बांधवांची उपस्थिती ; डॉ. कलाम फोरमचा पुढाकार….!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दिग्रस :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामुळे सध्या सगळीकडे देशभक्ती व तिरंगामय वातावरण आहे. लोकांमधील देशभक्तीचा आनंद अन उत्साह ओसंडून वाहत आहे. हेच औचित्य साधून येथील डॉ एपीजे अब्दुल कलाम फोरमच्या पुढाकाराने रविवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी सकाळी सायकल, मोटार बाईक तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यात शहरातील सर्व पक्षीय, सर्व धर्मीय समाज बांधव मोठ्या संख्येत सहभागी झाले होते. शहरातील शहिद, क्रांतिकारक, देशभक्त व समाज सुधारकांच्या स्मृतिस्थळ आणि पुतळ्यांना अभिवादन करीत रॅली शहारातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत पुढे गेली. यावेळी रॅलीत सहभागी तरुणांनी दिलेल्या देशभक्तीपर नाऱ्यांनी सारे शहर दुमदुमून गेले होते.
दिग्रस येथील तहसील कार्यालयापासून रॅलीला प्रारंभ झाला. जिल्हा शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी, तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी गट विकास अधिकारी रमेश खारोडे, गट शिक्षणाधिकारी मुकेश कोंडावार, नगरसेवक किशोर साबू, प्रा. राजेंद्र वानखडे यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून रॅलीला रवाना केले. क्रांतीवीर बिरसा मुंडा, माजी सैनिक शहिद मनोहर उघडे, परावीरचक्र विजेते शहीद अब्दुल हमीद, शेर ए हिंद टिपू सुलतान, देश गौरव नेताजी सुभाषचंद्र बोस, कमान गेट स्थित शहीद स्मारक, शहिद क्रांतिकारक भगत सिंग, भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज, स्व. पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री, हरीत क्रांतीचे प्रणेते स्व. मुख्यमंत्री वसंतराव नाईक, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आणि पुतळ्यांना अभिवादन करीत रॅली दिग्रस शहरातून मार्गक्रमण करीत होती. यावेळी संविधान दिनाचे प्रणेते सदानंद आठवले, कबड्डीपट्टू उद्धव अंबुरे, अंजुमन उर्दू संस्थेचे सचिव हाजी साजिद पहेलवान, घंटी बाबा संस्थानचे कोषाध्यक्ष गोपाल शहा, राज्य पुरस्काराने सन्मानित केंद्रप्रमुख किरण बारशे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम कुडवे, पत्रकार संघटनेचे प्राचार्य यशवंत सुर्वे पाटील, जितेश बुरकुंडे, लक्ष्यवेध क्रीडा अकादमीचे सुरेंद्र राठोड, सामाजिक कार्यक्रते विजय कांबळे, हरीश उपलेंचवार, अनिल कवठकर, नागेश तायडे, उईके, धुर्वे, आशिष अगलदरे रॅलीत सहभागी झाले होते.
या रॅलीत आपली सायकल किंवा मोटर बाईक व झेंडा देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येत रॅलीत सहभाग झाले. अंजुमन शाळेच्या मैदानावर राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप करण्यात आला. तिरंगा रॅलीच्या यशस्वीतेसाठी डॉ एपीजे अब्दुल कलाम फोरमच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.