ठाकरे-शिंदे एकत्र येण्याच्या मुद्द्यावर संजय राऊतांचं मोठं वक्तव्य ; थेटच म्हणाले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसात एकापेक्षा एक मोठे भूकंप होत आहेत.
शिवसेनेतून बंड करत 50 आमदारांना सोबत घेत एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करत मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. खासकरुन शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांच्या ट्वीटनंतर ही चर्चा जास्तच जोरात होऊ लागली आहे. यावर आता खुद्द खासदार संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे की, दिपाली सय्यद अभिनेत्री आहेत. पक्षाचे काम करतात. त्यांना हे अधिकार कोणी दिले याची मला माहिती नाही. अशा प्रकारची वक्तव्यं खूप काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. हे एकत्र होईल का हे येणारा काळ ठरवेल. ते आमचेच सहकारी, आमचेच मित्र आहेत. इतकी वर्ष आम्ही काम केलेलं आहे. तर एकत्र यावं असं का वाटणार नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
मंत्रिमंडळावरुन बोलताना ते म्हणाले की, संजय राऊत म्हणाले की, आमचे मंत्री सात होते, दोघे नव्हते. इथे गेल्या पंधरा दिवसापासून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची कॅबिनेट दोघांमध्ये होत आहे. भाजपमध्ये घटना तज्ञ, कायदे तज्ञ यांची फार मोठी फौज आहे. त्याची पीसं काढतील. पण यात नैतिकता कुठे आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत म्हणाले की, तुमच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळे शपथविधी करू शकला नाही. यांना मंत्रिपदाची शपथ घेण्याचा अधिकार राहिलेला नाही. घटना तुडवायची ठरवलं असेल तर मग तुमची मर्जी असंही राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, जे 40 लोक सोबत नेले त्यांच्यावर भरपूर काही आरोप भाजपनेच केले आहेत. अशा लोकांसोबत मांडीला मांडी लावून कसं बसायचं याबद्दल आता भाजपला चिंता आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबला आहे, असंही ते म्हणाले.
त्यांनी म्हटलं की, हे सगळे मंत्री पदासाठी गेलेले लोक आहेत. अनेक लोक मुंबईत येऊन शक्ती प्रदर्शन करत आहेत मंत्री करा असे प्रकार शिवसेनेत कधी झालेले नाहीत.