देशमुखांना क्लीनचीट…? ; चांदीवाल आयोगाचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता.
या आरोपांच्या चौकशीसाठी नेमलेल्या चांदीवाल आयोगाचा अहवाल मंगळवारी (ता. 26) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.
चांदीवाल आयोगाची चौकशी मागील महिन्यात पूर्ण झाली आहे. सुमारे 200 पानांचा हा अहवाल आयोगाकडून मुख्यमंत्र्यांना देण्यात आला. यावेळी गृहमंत्री वळसे पाटीलही उपस्थित होते. आयोगाने आपल्या अहवालात देशमुख यांना क्लिनचिट दिल्याचे समजते. परमबीरसिंह यांनी केलेले आरोप कळते-समजतेच्या आधारावर असल्याचा निष्कर्षही आयोगाने काढला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता सरकार या अहवालावरून काय पावले टाकणार हे महत्वाचे ठरणार आहे.

काय आहे प्रकरण…?
परमबीर सिंग यांनी मागीलवर्षी देशमुखांवर गंभीर आरोप केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. त्यांनी आरोपांचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठवले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने समितीची स्थापना केली होती. निवृत्त न्यायाधीश कैलास चांदीवाल यांच्या नेतृत्वाखाली ही समिती देशमुखांवरील आरोपांची चौकशी करीत होती. नंतर या समितीला दिवाणी न्यायालयाचे अधिकार देण्यात आले.
आयोगाकडून देशमुखांसह परमबीरसिंग आणि मुंबई पोलीस दलातील बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) याची चौकशी केली. तिघांनाही आयोगासमोर समोरासमोर आणण्यात आले होते. देशमुख व वाझे यांची समोरासमोरच झाडाझडती घेण्यात आली. देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी सीबीआयकडूनही केली जात आहे. ईडीकडून देशमुखांवर मनी लाँर्डिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…