राज्यात पुन्हा निर्बंध लागणार…? ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्रात 1 एप्रिल रोजी मास्क सक्ती हटवण्यात आली होती. मात्र, मुंबईतील कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मास्क सक्ती परतण्याची दाट शक्यता आहे.
दिल्लीतील सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या दोन हजारांच्या जवळ पोहोचली आहे. त्यात मुंबईतील कोरोना रूग्णांची संख्या देखील वाढत असल्याने सर्वांचीच धाकधूक वाढली आहे.
अशातच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्राच्या आरोग्य सचिवांना पत्र पाठवत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता राज्यात पुन्हा निर्बंध लावणार की काय?, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
देशात कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने सोशल डिस्टन्सिंग आणि सोबतच मास्कची देखील सक्ती राहावी, अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्र पाठवत महाराष्ट्राच्या आरोग्य सचिवांना दिल्या आहेत.
पाश्चिमात्य देशात कोरोना रूग्णसंख्या वाठली आहे तर दिल्लीत देखील रुग्णसंख्या वाठली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार आणि आयसीएमआर सर्व गोष्टींवर नजर ठेऊन आहेत. योग्य वेळी निर्णय घेऊ, असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्याने आता सक्ती नसली तरी सर्वांनी मास्क घालावा, असा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे.

विदर्भात उन्हाचं ‘तांडव’ ; तरुण शेतमजुर दगावला ; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट….
महाराष्ट्र सरकारचे कॉस्ट कटींगचे ३ नियम लागू, अधिकाऱ्यांच्या खर्चावर चाप; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद….
चिकन प्रेमींनो सावधान..! राज्यात बर्ड फ्लूचं थैमान, नंदुरबारमध्ये आतापर्यंत 4 लाख कोंबड्या, 21 हजार अंडी केली नष्ट….
३ मे रोजी झालेली NEET 2026 परीक्षा अखेर रद्द, आता ‘या’ दिवशी होणार पुन्हा पेपर..?
सरकारमध्ये दोनच खाती महत्त्वाची’, बावनकुळेंची राष्ट्रवादी शिवसेनेवर कुरघोडी, नेमका इशारा काय….?
‘तुम तो ठहरे परदेसी साथ क्या..’ या सुपरहिट गाण्याचे गीतकार जहीर आलम काळाच्या पडद्याआड…..