दिल्लीत कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी केंद्र सरकारची :- अरविंद केजरीवालांची प्रतिक्रिया….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- काल राजधानी दिल्लीच्या जहांगीरपुरी या भागात हनुमान जयंती निमित्त निघालेल्या शोभायात्रेवर दगडफेक केली गेली. यानंतर वादाने हिंसक वळण घेतले होते. काही पोलीस कर्मचारी जखमी झाले.
पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली होती. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जहांगीरपूर येथे आरएएफचे दोन तुकडी तैनात केली आहे. या हिंसेच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली पोलीस आयुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त यांच्याशी संवाद साधला.
या घटनेवर अरविंद केजरीवाल म्हणाले की, “दिल्लीच्या जहांगीरपुरी येथे शोभायात्रेवर झालेल्या दगडफेकीचा मी निषेध करतो, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. सगळ्या लोकांना अपील आहे की ते एकमेकांचा हात धरून शांती राखून ठेवावी. शांती शिवाय देश प्रगती करू शकत नाही. कायदा सुव्यवस्था राखणे ही केंद्राची जबाबदारी आहे. केंद्र सरकारने दिल्लीत शांतता राखून ठेवायला हवे. ”
कालच्या या घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलीस आणि जवानांच्या दल हे शांतता राखण्याचे काम पार पडत आहेत.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….