तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांकडून मोदींना 24 तासांचा अल्टीमेटम , अन्यथा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगण राष्ट्र समितीचे (टीआरएस) अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांनी शेतकरी आणि शेतीच्या मुद्द्यावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला खुले आव्हान दिले आहे.
लवकरात लवकर नवीन कृषी धोरण आणा अन्यथा आम्ही तुम्हाला सत्तेतून काढून टाकू असा इशारा त्यांनी केंद्राला दिला आहे. शेतकऱ्यांना गंगेत ढकलण्याइतके आम्ही दुबळे नाही, असेदेखील केसीआर म्हणाले. धान खरेदीबाबत तेलंगणाच्या मागणीला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री राव यांनी केंद्राला 24 तासांचा अवधी दिला असून, तसे न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असे ते म्हणाले. तांदूळ खरेदीच्या मुद्द्यावरून नवी दिल्लीत पक्षाच्या नेत्यांसोबत आंदोलन करताना त्यांनी केंद्राला वरील इशारा दिला आहे.

सीएम राव म्हणाले की, तेलंगाणातील शेतकरी (Farmer) भीक मागत नाहीत तर हक्क मागत असून, लवकरात लवकर नवीन कृषी धोरण बनवा अन्यथा केंद्रातील सरकारला काढून टाकू असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच शेतकऱ्यांना साथ न देणाऱ्या पंतप्रधानांना काहीतरी वाटले पाहिजे. “मोदींमध्ये (Narendra Modi) हिंमत असेल तर, त्यांनी मला अटक करावी असे म्हणत, जो कोणी त्यांच्या विरोधात बोलतो, त्यांच्याविरुद्ध सीबीआय आणि ईडी (CBI & ED) लावली जाते. मात्र, आपण पंतप्रधान आणि केंद्रीय अन्न मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांना हात जोडून सांगतो की, कृपया आमचे अन्नधान्य खरेदी करा. मी तुम्हाला 24 तास देतो, त्यानंतर आम्ही आमचा निर्णय घेण्यास मोकळे असल्याचे राव यांनी स्पष्ट केले आहे. हे षड्यंत्र करणारे सरकार असल्याचा घणाघातही त्यांनी यावेळी बोलताना केला आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..