“पवार कुटुंबांनं महाराष्ट्र विकत घेतलं आहे का…?” ; निलेश राणेंचा खोचक सवाल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्यानंतर राज्यात जोरदार वाद पेटला आहे.
महाविकास आघाडीतील मंत्री आणि भाजप नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. अशातच भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणेंनी पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे.
एकही काच फुटली नाही किंवा घराचं नुकसान झालं नाही तरी राज्याचे गृहमंत्री आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पवार साहेबांच्या घरी पोहोचले. पोलीस अधिकारी घरात जाऊन तपासा बद्दल माहिती देण्यासाठी पवार कुटुंबाने महाराष्ट्राला विकत घेतले आहे का?, असा सवाल राणेंनी केला आहे.
पवारांना इनामात ब्रिटिश सोडून गेले की महात्मा गांधी?, असं देखील वक्तव्य निलेश राणेंनी केलं आहे. परिणामी राज्यात पवारांवरील हल्ल्यानंतर राजकीय वाद वाढला आहे. शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यामागं कोण होतं याचा शोध मुंबई पोलीस घेत असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र पवारांवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. पण काही भाजप नेत्यांनी पवारांवर टीकेची झोड कायम ठेवली आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….
मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….