स्थानिक निवडणुकीची वार्ड फेररचना करा ; निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला पत्र….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील महापालिका निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे वॉर्ड फेररचनेचे काम सुरू करण्यासाठीचा ठराव विधिमंडळात एकमताने पारित करण्यात आला होता.
आता या ठरावानुसारच वॉर्ड फेररचना सुरू करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला पत्र पाठविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली
ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील महापालिका निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे वॉर्ड फेररचनेचे काम सुरू करण्यासाठीचा ठराव विधिमंडळात एकमताने पारित करण्यात आला होता. आता या ठरावानुसारच वॉर्ड फेररचना सुरू करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला पत्र पाठविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विधिमंडळात पारित झालेल्या ठरावानुसार सरकारने वॉर्ड फेररचनांचे अधिकार स्वत:कडे घेतले होते. आयोगाने नव्या रचनांना मान्यता दिल्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांणधील निवडणुका पार पडतील. तथापि त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्याच्या उद्देशानेच आयोगाने राज्य सरकारला पत्र लिहिले आहे.
205 नगर परिषदा, 1,930 ग्रामपंचायत, 16 महापालिका, 25 जिल्हा परिषद, 284 पंचायत समित्या यांच्या निवडणुका खोळंबलेल्या आहेत.
वॉर्ड फेररचनेच्या कामाबाबातचे पत्र पाठविणे हा एक प्रक्रियेचा भाग असल्याचाही दावा केला जात आहे. तथापि, फेरचनेचे काम हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखांना डोळ्यांसमोर ठेवून करणे आवश्यक असल्याची गरजही व्यक्त केली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लांबलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगालाही त्याच दृष्टीने तयारी करावी लागणार आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….