मदरशात दाढीचा वस्तरा जरी सापडला तरी राजकारण सोडून देतो :- जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना खुलं आव्हान…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात मदरश्यांबाबत केलेल्या विधानाचा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
‘पंतप्रधानांना माझी विनंती आहे की त्यांनी मदरश्यांमध्ये धाडी टाकाव्यात. या मदरश्यांमध्ये काय काय सापडेल ना ते पाहून धडकी भरेल’, असं विधान राज ठाकरे यांनी कालच्या भाषणात केलं. त्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर देत मदरश्यात दाढीचा वस्तरा जरी सापडला तरी राजकारण सोडेन, असं खुलं आव्हान राज ठाकरे यांना दिलं आहे.
आपल्याकडे महाराष्ट्राच्या विकासाचा फॉर्म्युला आहे असं सांगून महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची भाषा करणारे राज ठाकरे मशिदीच्या बाहेर पोरांना बसवतात हे प्रगती आहे का अधोगती आहे कळत नाही, असा टोला आव्हाड यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. “राज ठाकरे यांनी मुंब्र्याबद्दल कारण नसताना जातीयवादी विधान केलं. माझं राज यांना जाहीर आव्हान आहे की, त्यांनी माझ्यासोबत मुंब्र्यातील कोणत्याही मदरशात यावे. दाढीचा वस्तरा जरी सापडला तरी राजकारण सोडून देईल. मुंब्र्यात काही शतक हिंदू मुसलमान प्रेमाने राहतात”, असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

“कळवा-मुंब्रा या मतदार संघात ६७ टक्के हिंदू आहेत आणि ३३ टक्के मुसलमान त्यात मी ७५ हजार मतांनी विजयी झालो. कळव्यातून ३० हजार मतांची आघाडी आणि मुंब्र्यातून ४५ हजार मतांची आघाडी. लोक कामावर मत देतात जाती पातीवर नाही. १८ तास राबावे लागते. शेवटच्या माणसापर्यंत पोहचावे लागते”, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

लाखांच्या सभेसमोर टाळ्या घेण्यासाठी बोलणं फार सोपं असतं. पण आपल्या वक्तव्याचे परिणाम काय होतील, महाराष्ट्रामध्ये त्याचे काय पडसाद उमटतील याचा जरा तरी विचार करा. ज्या घरात जन्माला आला तुम्ही. त्या घरात महाराष्ट्राची संयुक्त चळवळ उभी राहिली आहे, त्या महाराष्ट्राला जाळायचा प्रयत्न करू नका, असं आवाहनही त्यांनी केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या घडामोडींना वेग, थेट गुप्त बैठक….