प्रसिद्ध राष्ट्रसंत भय्यू महाराज यांची आत्महत्या प्रकरणाचा निकाल ; मुख्य सेवकांसह दोघांना सहा वर्षाची शिक्षा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
इंदूर : मध्य प्रदेशातील प्रसिद्ध राष्ट्रसंत भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी इंदूर कोर्टात शुक्रवारी अंतिम सुनावणी झाली. न्यायालयाने मुख्य सेवक विनायक, चालक शरद आणि केअरटेकर पलक यांना दोषी ठरवले आहे. या सर्वांना 6-6 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आदेशात म्हटले आहे की, भैय्यू महाराज यांचा नोकरदारांनी इतका छळ केला की त्यांनी आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, साडेतीन वर्षांच्या सुनावणीनंतर सत्र न्यायालयाने हा निकाल दिला. 32 साक्षीदारांची सुनावणी झाली. उच्च न्यायालयात हा गुन्हा सिद्ध झाला आहे. महाराजांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सत्र न्यायाधीश धर्मेंद्र सोनी यांनी महाराजांचे मुख्य सेवक शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक यांना शिक्षा सुनावली. आरोपी पैशासाठी महाराजांचा छळ करत होते, हे न्यायालयाने मान्य केले. त्यांना पैशांसाठी ब्लॅकमेलही करण्यात आले.
दरम्यान, भय्यू महाराज यांनी 12 जून 2018 रोजी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. भैय्यू महाराजांना कुटुंबापेक्षा जे सेवेकरी होते, ज्यांच्यावर त्यांचा एवढा विश्वास होता की त्यांनी त्यांचा आश्रम आणि काम त्यांच्याकडे सोपवले होते, त्याच सेवेकऱ्यांनी त्यांना पैशासाठी एवढा त्रास दिला की त्यांना आत्महत्येसारखे पाऊल उचलावे लागले.
याप्रकरणी १९ जानेवारीला साडेपाच तास सुनावणी झाली. यात भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचा निकाल २८ जानेवारीला सुनावण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले. महाराजांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल त्यांचे सेवक विनायक, शरद आणि पलक बराच काळ तुरुंगात आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र सोनी यांच्या न्यायालयात दोन सत्रांत साडेपाच तास सुनावणी झाली.
आरोपी विनायकच्या वतीने अधिवक्ता आशिष चौरे यांनी युक्तिवाद केला. यापूर्वी दोन आठवडे सरकार, तसेच शरद आणि विनायक यांच्या वतीने अंतिम युक्तिवाद झाले होते. महाराजांनी स्वत:वर गोळी झाडण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये ट्रस्टची जबाबदारी विनायकवर सोपवण्यात आली होती, त्यांच्या नावावर असलेली संपत्ती नाही, असा युक्तिवाद विनायक यांच्या वकिलाने केला.
त्यामुळेच त्याला गोवण्यात आले आहे. घटनेच्या काही दिवसांपूर्वी भय्यू महाराज पुण्याला जात होते. त्यांना वारंवार कोणाचे तरी फोन येत होते, त्याचाही पोलिसांनी योग्य तपास केला नाही, अन्यथा योग्य आरोपी सापडला असता, असे त्यांनी म्हटले होते. यापूर्वी शरदचे वकील धर्मेंद्र गुर्जर यांनी दोन दिवसांत 10 तास, तर पलकचे वकील अविनाश सिरपूरकर यांनी पाच दिवस युक्तिवाद केला होता. या खटल्यात ३० हून अधिक साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले आहेत.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….