महाराष्ट्रात रेल्वेने मोठी भरती ; परीक्षा ही नाही ; १० वी पास ; आयटीआय झालेल्यांनी अर्ज करावा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्रात रेल्वेने मोठी भरती आयोजित केली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) ने सेंट्रल रेल्वेमध्ये अॅप्रेंटिस भरती २०२२ चे नोटिफिकेशन जारी केले आहे.
१० वी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये अॅप्रेंटीस करण्याची मोठी संधी आहे. २००० हून अधिक जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी rrccr.com या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
जर तुम्ही इच्छुक असाल आणि तुम्हाला कमीतकमी ५० टक्के मार्कांसह १० वी पास झालेला असाल तर नोकरीची संधी आहे. संबंधीत ट्रेडमध्ये तुम्ही आयटीआय पास झालेले असायला हवे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया १७ जानेवारी २०२२ पासून सुरु झाली आहे. १६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत. रेल्वे भरती २०२२ ची आवश्यक माहिती आणि नोटिफिकेशनची लिंक खाली देण्यात आली आहे.
मुंबई क्लस्टर – 1659 पदे
भुसावल क्लस्टर – 418 पदे
पुणे क्लस्टर – 152 पदे
नागपुर क्लस्टर – 114 पदे
सोलापुर क्लस्टर – 79 पदे
एकूण पदांची संख्या – 2422 पदे
अॅप्रेंटीस पदासाठी योग्य उमेदवाराची निवड परीक्षेविना होणार आहे. यासाठी १०वी चे मार्क आणि आयटीआय मार्कांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार केली जाईल. यानंतर क्लस्टरनुसार उमेदवारांची निवड केली जाईल.
अर्ज शुल्क…
सामान्य, ओबीसी आणि आर्थिक दृष्ट्या मागास उमेदवारांना १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर अन्य उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….