केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारली….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होणार होता. त्यासाठी जैवविविधतेची मानके या विषयावर आधारित चित्ररथ तयार करण्यात आला होता.
मात्र, केंद्र सरकारने या चित्ररथाला परवानगी नाकारण्यात आली. सुरक्षेच्या कारणावरून ही परवानगी नाकारल्याचे समजते.
केंद्र सरकारने एक दिवसापूर्वी पश्चिम बंगालच्या रथाला देखील परवानगी नाकारली होती. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. तसेच त्यांना पत्र देखील पाठवले होते. ममता यांनी आपल्या पत्रात, केंद्र सरकारच्या अशा वागण्यामुळे लोकांना धक्का बसला आहे. देशाला 75 वर्ष पूर्ण होत असताना देशातील स्वातंत्र्य सेनानींच्या योगदानावर आधारित चित्ररथाला जागा न मिळणे हे संतापजनक आहे, असं त्यांनी पत्रात म्हटलं होतं. आता पश्चिम बंगालपाठोपाठ केरळ, बिहार आणि महाराष्ट्राच्या चित्ररथाला देखील परवानगी नाकारण्यात आली आहे.
प्रजासत्ताक दिनी राजपथा होणाऱ्या संचलात प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे चित्ररथ सहभागी होत असतात. यामध्ये विविध राज्यांच्या चित्ररथांना ठराविक निकषांनुसार संधी दिली जाते. यंदाच्या प्रजासत्ताकदिनी दिल्लीत होणाऱ्या संचलनात ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी होणार होता. मात्र, संरक्षण मंत्रालयाने यंदा परवानगी नाकारल्याने या चित्ररथाचे संचालन प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये होणार नाही.