आयुष्यभर बूस्टर डोस घेत राहायचं का…? ; काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकरांचा घरचा आहेर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
चंद्रपूर : देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेची झोप उडाली आहे. तर दुसरी कोरोना (Corona ) प्रतिबंधक नियम कडक केले जात आहेत.
मात्र या नियमांना काही लोकांकडून विरोध केला जातोय. खुद्द सत्तेत असलेल्या आणि महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य तसेच केंद्र सरकार अपयशी ठऱल्याचं म्हटलं आहे. तसेच लोकांनी आयुष्यभर बूस्टर डोस (Booster Dose) घेत राहायचे का असा सवालही त्यांनी केला आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
राज्य आणि केंद्र सरकारने निश्चित उपाययोजना केल्या नाहीत
काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही अपयशी ठरले आहेत. लोकांनी आयुष्यभर बूस्टर डोस घेत राहायचे का ? सर्व निर्बंध शिथिल करायला हवेत. निर्बंधांबाबतचा निर्णय सर्व विषय समजून घेतला गेला पाहिजे. 2 वर्षांच्या कालखंडात राज्य आणि केंद्र सरकारने कुठल्याच निश्चित उपाययोजना केल्या नाहीत, असे बाळू धानोरकर म्हणाले.
शाळा बंद करण्याच्या निर्णयावरदेखील टीका
तसेच त्यांनी शाळा बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरदेखील टीका केली. यापूर्वी बाळू धानोरकर यांनी कालच ताडोबा व्याघ्र प्रकल्प सुरु करण्याची मागणी केली होती. सध्या राज्यातील सर्व पर्यटन केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असताना ताडोबा व्याघ्र प्रकल्प सुरु करण्याची मागणी केल्यामुळे धानोरकर चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी कोरोना प्रतिबंधक नियमांवरुन राज्य तसेच केंद्र सरकारला लक्ष्य केल्यामुळे त्यांची चर्चा होत आहे