तर बार आणि दारूची दुकाने करावी लागणार बंद :- राजेश टोपे…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
जालना :- राज्यात सध्या ४० हजार कोरोना रूग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी होऊ न देणे हा उपाय असून त्यानुसार मुख्यमंत्री यांनी निर्बंध लागू केले आहेत. मात्र, बार आणि दारूच्या दुकानांवर गर्दी होत असेल तर ते ही बंद करावीलागतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी (ता.९) जालना येथे पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.
यावेळी आरोग्यमंत्री श्री.टोपे म्हणाले, की राज्यात कोरोनाच्या रुग्णांत झपाट्यात वाढ होत असल्याने नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे निर्बध रविवारी (ता.९) रात्रीपासून लागू होणार आहेत. त्यामुळे या निर्बंधाचे नागरिकांनी पालन करावे असे अवाहन करत श्री. टोपे म्हणाले की, सध्या राज्यात रोज ४० हजारांपेक्षा अधिक रूग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा वाढत संसर्ग रोखण्यासाठी ज्या ठिकाणी गर्दी होईल येथे निर्बंध लावले जातील. सध्या राज्यात ऑक्सिजनची नगण्य मागणी वाढल्याचे ही श्री.टोपे यांनी यांनी यावेळी सांगितले.

पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा…..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….