राज्यात २४ तासांत २६,५३८ नव्या कोरोनाबांधिताची भर ; ओमायक्रॉन रुग्णाचा आकड़ा ७९७ वर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात तूर्तास लॉकडाउन लागू केला जाणार नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलं असलं, तरी गर्दी नियंत्रित करणारे कठोर निर्बंध घातले जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध लागू होण्याची शक्यता वाढलेली आहे. त्यातच आज दिवसभरात तब्बल २६ हजार ५३८ नव्या करोनाबाधितांची भर राज्याच्या एकूण आकड्यामध्ये झाली आहे. त्यामुळे राज्यातल्या अॅक्टिव्ह करोनाबाधिताचा आकडा आता ८७ हजार ५०५ इतका वाढला आहे. त्यासोबतच राज्यातील ओमायक्रॉनच्या एकूण बाधितांचा आकडा देखील तब्बल ७९७ वर गेल्यामुळे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे.
आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात दिवसभरात वाढ झालेल्या बाधितांमुळे आजपर्यंत राज्यात आढळलेल्या एकूण बाधितांचा आकडा ६७ लाख ५७ हजार ०३२ इका झाला आहे. त्यापैकी ८७ हजार ५०५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज दिवसभरात राज्यातील एकूण ५ हजार ३३१ बाधित करोना निगेटिव्ह होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत ६५ लाख २४ हजार २४७ करोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट सध्या ९६.५५ टक्के इतका असल्याची नोंद करण्यात आली आहे.
राज्याचा मृत्यूदर २.०९ टक्क्यांवर
दरम्यान, राज्यात आज दिवसभरात ८ करोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा एकूण मृत्यूदर २.०९ टक्क्यांवर आला आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात करोनामुळे १ लाख ४१ हजार ५८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे
ओमायक्रॉनची राज्यात काय परिस्थिती?
राज्य सरकारने आजची ओमायक्रॉन रुग्णांची आकडेवारी देखील जाहीर केली आहे. आज दिवसभरात राज्यात तब्बल १४४ ओमायक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी मुंबईत १००, नागपूरमध्ये ११, ठाणे आणि पुणे मनपा क्षेत्रात ७, पिंपरी-चिंचवडमध्ये ६, कोल्हापूरमध्ये ५, अमरावती, उल्हासनगर आणि भिवंडी मनपा क्षेत्रात प्रत्येकी २ तर पनवेल आणि उस्मानाबादमध्ये प्रत्येकी १ ओमायक्रॉन बाधित सापडल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉन बाधितांचा आकडा ७९७वर गेला आहे.

३ मे रोजी झालेली NEET 2026 परीक्षा अखेर रद्द, आता ‘या’ दिवशी होणार पुन्हा पेपर..?
सरकारमध्ये दोनच खाती महत्त्वाची’, बावनकुळेंची राष्ट्रवादी शिवसेनेवर कुरघोडी, नेमका इशारा काय….?
‘तुम तो ठहरे परदेसी साथ क्या..’ या सुपरहिट गाण्याचे गीतकार जहीर आलम काळाच्या पडद्याआड…..
थलपती विजय यांच्यासह १० जणांनी घेतली शपथ, मंत्रीमंडळात तरूणांना मोठी संधी; मंत्र्यांची यादी आली समोर…
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच विजय यांचे तीन धडाकेबाज निर्णय, कोणत्या फाइलवर केली पहिली सही..?
‘राज ठाकरे तुझे विचार माझ्या पायाच्या बुटाच्या धुळीबरोबर आहेत…’, सदावर्ते हे काय बोलून गेले..?