मुख्यमंत्री उद्धव ठाकरेनी बोलावली टास्कफोर्सची बैठक…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात काल दिवसभरात सुमारे ४,००० नव्या रुग्णांची नोंद झाल्याने चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (गुरुवार) कोविड टास्क फोर्सची बैठक बोलावली आहे.
या बैठकीत निर्बंध अधिक कडक करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
कालच थर्टीफर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित कार्यक्रमांवर निर्बंध आणणारी नवी नियमावली राज्य शासनानं जाहीर केली होती. दरम्यान, राज्यात काल दिवसभरात सुमारे ४,००० नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ८५ ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळं वर्षाच्या शेवटच्या दिवशी आणि नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन संसर्गाचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापार्श्वभूमीवर महत्वाची चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्कफोर्सची बैठक बोलावली आहे.