बीडवासीयांचे स्वप्न पूर्ण ; गोपीनाथ मुंडेची फोटो लावून धावली ट्रेन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अहमदनगर :- अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गावरील नगर ते आष्टी या ६१ किलोमीटर अंतरावर रेल्वेची यशस्वी चाचणी. अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गावरील नगर ते आष्टी या ६१ किलोमीटर अंतरावर बुधवारी (ता.२९) बारा डब्यांची रेल्वेची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
दुपारी २ वाजता सदरील रेल्वे कडा येथून आष्टी रेल्वे स्थानकावर पोहोचली असता खासदार प्रीतम मुंडे यांच्याहस्ते उदघाटन करून नंतर हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यानंतर आष्टी ते अहमदनगर हायस्पीड रेल्वे धावली. यावेळी आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे, रघुनाथ शिंदे, शंकर देशमुख उपस्थित होते.
नगर ते आष्टीपर्यंत रेल्वे येण्यासाठी तब्बल २६ वर्षांचा कालावधी लागला. रेल्वे बीड व परळीपर्यंत कधी धावणार? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. नगर-बीड-परळी या रेल्वे मार्गाला १९९५ मध्ये तत्त्वतः मान्यता मिळाली. या रेल्वेमार्गासाठी दिवंगत खासदार केशरबाई क्षिरसागर, दिवंगत माजी मंत्री गोपीनाथराव मुंडे, दिवंगत मंत्री डॉ. विमलताई मुंदडा, खासदार रजनी पाटील, खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह रेल्वे संघर्ष समितीने आंदोलनाच्या माध्यमातून मोठा हातभार लावला.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनीही यात विशेष लक्ष घातले. त्यामुळे नगर ते आष्टी या ६१ किलोमीटर अंतरावरील लोहमार्गाचे काम पूर्ण झाले. नगर ते आष्टी या ६१ किलोमीटर अंतरावर बुधवारी हायस्पीड रेल्वे (ताशी १४४ किलोमीटर) बारा डब्यांसह धावली. आष्टी तालुक्यातील सोलापूरवाडी, कडा व आष्टी येथील रेल्वे स्थानकावर नागरिकांच्या वतीने दक्षिण मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. रेल्वे प्रथमच आष्टी येथे आल्याने रेल्वे पाहण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
अर्ध्या खर्चाचा भार उचलला अन्
अनेक वर्षे रखडलेल्या रेल्वेमार्गाचा तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी अर्धा खर्च राज्य सरकार करणार असा धोरणात्मक निर्णय घेतला. त्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांसह रेल्वे संघर्ष समितीने पाठपुरावा केला होता. तेव्हापासून खऱ्या अर्थाने या मार्गाच्या कामाला गती मिळाली.