मराठा समाजाची राज्य शासनाकडून फसवणूक ; पुन्हा आंदोलन- संभाजी राजे
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद
आरक्षण आणि अन्य प्रश्नावरून सरकार मराठा समाजाची फसवणूक करीत आहे. राज्य सरकारने पाठविलेले पत्र अधिकाऱ्यांनी लिहिले असून मुख्यमंत्र्यानी देखील याची पुरेशी दखल घेतलेली नाही. त्यामुळे समाजाने शांततेच्या मार्गाने
केलेल्या आंदोलनाची सरकार दखल घेणार नसेल तर पुन्हा तीव्र आंदोलन करू ,असा इशारा खासदार संभाजी राजे यांनी दिला आहे.
शासनातील अधिकारी मुख्यमंत्री आणि सरकारला अंधारात ठेवत असून सारथीला पुरेसा निधी दिला जात नसल्याचा गंभीर आरोपही राजे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी सरकारने मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती पत्राद्वारे संभाजीराजे यांना दिली होती.
मुख्यमंत्र्यांच्या पत्रानुसार सरकारकडून मराठा समाजाच्या आंदोलनाकडे होणारे दुर्लक्ष पाहून कंटाळलो आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मराठा समाज आणि समन्वयक यांना वेठीस धरण्याऐवजी समाजाने परवानगी दिल्यास मी एकटाच आझाद मैदानात आंदोलनास बसायला तयार आहे. मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्रातील एकूण १५ मुद्दय़ांमध्ये ज्या निर्णयांबाबत माहिती दिली आहे, त्याने आपले मुळीच समाधानी नसल्याचा संताप संभाजी राजेंनी व्यक्त केला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..