बच्चू कडूंच्या आंदोलनाची वेळ संपली, कोर्टाचा आदेश घेऊन पोलिस आंदोलनस्थळी दाखल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- “शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी नागपूरमध्ये बच्चू कडू यांनी आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनासाठी मोठ्या सख्येने शेतकऱ्यांनी पाठिंबा दिलेला आहे. मात्र कोर्टाने बुधवारी सहा वाजल्यानंतर आंदोलनस्थळ सोडण्याचे आदेश दिलेले होते.
परंतु आंदोलनाची वेळ संपली तरी बच्चू कडू आंदोलनावर ठाम असल्याचं दिसून येतंय.
कोर्टाने दिलेल्या आदेशाची प्रत घेऊन सायंकाळी सहा वाजता पोलिस अधिकारी बच्चू कडू यांच्या आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. त्यांची कडूंसोबत चर्चा सुरु असून आंदोलनाबाबत काय निर्णय होतो, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.
जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत आंदोलनस्थळ सोडणार नाही अशी भूमिका बच्चू कडू यांनी आधीच बोलून दाखवली होती. मात्र कोर्टाचा आदेश ते पाळणार का, हे पाहाणं महत्त्वाचं आहे. ‘जनताच आमचं कोर्ट आहे’ अशीही प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी आधीच दिलेली आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार, हे लवकरच लक्षात येईल.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..