तानाजी सावंत राजभवनावर फिरकलेच नाहीत, हॉटेलमध्येच पॅक केली बॅग; महायुतीत मिठाचा खडा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपुर :- “आज नागपूरमध्ये महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्ताराचा सोहळा संपन्न झाला. यामध्ये 39 नेत्यांनी मंत्रीपदाचीशपथ घेतली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना पद आमि गोपनीयतेची शपथ दिली.
दरम्यान, मंत्रीपद न मिळाल्यामुळं काही नेते नाराज असल्याची माहिती मिळत आहे. यातीलच एक नाव म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे परांडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant). तानाजी सावंत यांना मंत्रीमंडळात संधी मिळाली नसल्यानं ते नाराज आहेत. मंत्रीपद मिळालं नसल्यानं तानाजी सावंत हे नागपूरच्या रेडिसन्स ब्लू हॉटेलमधून बॅग पॅक करुन निघून गेले आहेत.
तानाजी सावंत यांना मंत्रीपदाची संधी मिळाली नसल्याने ते नाराज आहेत. ते आज राजभवनावर फिरकलेच नाहीत. तानाजी सावंत नाराज झाल्यामुळं महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. गेल्या मंत्रीमंडळात तानाजी सावंत यांच्याकडे आरोग्य मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, त्यांच्यावर विविध आरोप करण्यात आले होते. त्यामुळं यावेळी मंत्रीमंडळातून त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या नेत्यांची नावे
1.चंद्रशेखर बावनकुळे
2.राधाकृष्ण विखे पाटील
3.हसन मुश्रीफ
4.चंद्रकांत पाटील
5.गिरीश महाजन
6.गुलाबराव पाटील
7.गणेश नाईक
8.दादाजी भुसे
9.संजय राठोड
10.धनंजय मुंडे
11.मंगलप्रभात लोढा
12.उदय सामंत
13.जयकुमार रावल
14.पंकजा मुंडे
15.अतुल सावे
16.अशोक उईके
17.शंभूराज देसाई
18.आशिष शेलार
19. दत्तात्रय भरणे
20. आदिती तटकरे
21. शिवेंद्रराजे भोसले
22. माणिकराव कोकाटे
23. जयकुमार गोरे
24. नरहरी झिरवळ
25 . संजय सावकारे
26.संजय शिरसाट
27. प्रताप सरनाईक
28. भरतशेठ गोगावले
29. मकरंद पाटील
30. नितेश राणे
31. आकाश फुंडकर
32. बाबासाहेब पाटील
33. प्रकाश आबीटकर
राज्यमंत्रीपदी कोणाची वर्णी
34. माधुरी मिसाळ
35. आशिष जैयस्वाल
36. पंकज भोयर
37. मेघना बोर्डीकर
38. इंद्रनील नाईक
39. योगेश कदम

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..