“नीट” परीक्षा तात्काळ रद्द करावी , वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- नीट परीक्षेत गैरव्यवहार झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे ही परीक्षा तातडीने रद्द करावी, असे आम्ही राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाला कळवणार आहोत.
नीट परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी दोन – तीन वर्ष मेहनत करीत असतात, पालकही त्यांच्या पाठीशी असतात. परंतु, जर अशा पद्धतीने निकाल लागून विद्यार्थ्यांवर अन्याय होत असेल, तर ते चुकीचे आहे. यासाठी वेळप्रसंगी आम्ही न्यायालयात जाण्याचा प्रयत्नही करीत आहोत. ही परीक्षा रद्द करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वाची असलेली नीट परीक्षा पैसे खाऊनच झाली आहे. मागील वर्षी दोनच विद्यार्थ्यांना ७२० गुण मिळाले होते. यावर्षी अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. इतकी संख्या कशी वाढली आहे. या निकालामुळे महाराष्ट्रातील कोणत्याही विद्यार्थ्याला राज्यातील सरकारी किंवा खासगी महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणार नाही. महाराष्ट्रावर अन्याय करणारी ही परीक्षा आहे. ही परीक्षा तात्काळ रद्द झाली पाहिजे, अशा सूचना महाराष्ट्र सरकारकडून राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाला करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी पालक भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
‘नीट’च्या ६० हून अधिक विद्यार्थी-पालकांनी शुक्रवारी मुश्रीफ यांची भेट घेतली. यावेळी पालकांनी विविध प्रश्न मुश्रीफ यांच्यापुढे मांडले. त्यानंतर, नीट परीक्षा आणि निकालाशी संबंधित सर्व माहितीचे न्यायवैदक परीक्षण करण्यासाठी आणि त्याची सीबीआयकडून चौकशी होण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाला आणि राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाला पत्र पाठविणार असल्याचे आश्वासन मुश्रीफ यांनी पालकांना दिले. तसेच, ‘नीट’च्या परीक्षेची सीबीआय चौकशी व न्यायवैदक परीक्षण व्हावे. समुपदेशन व प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात यावी. विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली असल्यामुळे परीक्षा रद्द करू नये, मात्र ज्या विद्यार्थ्यांना वाढीव गुण दिले आहेत, ते नियमांच्या विरुद्ध असल्यामुळे रद्द करावे आणि महाराष्ट्रातील होतकरू विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, असे पालकांचे म्हणणे आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..