मोठी बातमी…! संजय राऊतांच्या अडचणीत वाढ..?, हक्कभंग कार्यवाहीवर केंद्र सरकार निर्णय घेणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- संजय राऊत यांच्यावरील हक्कभंग कार्यवाहीचा चेंडू आता केंद्राच्या कोर्टात गेला आहे. विधानसभेकडून संजय राऊत यांचे हक्कभंग प्रकरण राज्यसभेत जाणार आहे.
राऊतांवरील कार्यवाही संदर्भात राज्यसभेचा अभिप्राय घेणार आहे. आजच हक्कभंग प्रकरण विधानसभेकडून राज्यसभेकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. राज्यसभेच्या या अभिप्रायाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
खारदार संजय राऊत यांनी सत्तधाऱ्यांवर टीका करताना विधिमंडळाला ‘चोरमंडळ’ असं म्हटलं होतं. त्यानंतर या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांवर मोठी टीका केली. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी या प्रकरणी राऊतांविरोधात हक्कभंग प्रस्तावाची मागणी केली होती. अशात आता हा मुद्दा केंद्र सरकारकडे जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे संजय राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.