दिल्लीत पुन्हा शाळा बंद ; सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर केजरीवाल सरकारचा निर्णय….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- दिल्लीतील प्रदूषणात घट झाल्याने शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, आता पुन्हा दिल्लीतील प्रदूषणात वाढ झाल्याने शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केजरीवाल सरकारचा हा आदेश शुक्रवारपासून लागू होणार आहे. दिल्ली आणि एनसीआर परिसरात गेल्या महिन्याभरापासून प्रदूषणात वाढ होत आहे. गुरुवारी प्रदूषणाची श्रेणी 600 च्या पार गेली होती. प्रदूषणात मोठी वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
दिल्लीतील प्रदूषणाच्या समस्येबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याबाबत गुरुवारीही सुनावणी झाली. त्यात शाळा सुरू करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. दिल्लीत प्रदूषण वाढत असताना सरकारने शाळा का सुरू केल्या असा सवाल विचारत सर्वोच्च न्यायलयाने दिल्ली सरकारला फटकारले. दिल्लीत अनेक नागरिक वर्क फ्रॉम होम करत असताना सकाळी धुक्यात आणि प्रदूषण वाढलेले असताना मुलांना शाळेत का जावे लागत आहे, अशी विचारणा न्यायालयाने केली.
मुलांचे पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार असतील, तरच त्यांनी मुलांना शाळेत पाठवावे. मुलांवर शाळेत जाण्याची सक्ती करू नये. शाळा-कॉलेज आणि सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दिलेली वर्क फ्रॉम होमची सुविधा सरकारने का रद्द केली, याबाबत दिल्ली सरकारने स्पष्टीकरण द्यावे, असे निर्देशही न्यायालयाने दिले. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर दिल्ली सरकारने पुन्हा एकदा पुढील आदेशापर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दिल्लीत वाढत्या प्रदूषणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने प्रदूषण कमी करण्याबाबत 24 तासात योग्य ती पावले उचलावीत. आम्ही त्यांना 24 तासांचा वेळ देत आहोत. त्यानंतर आम्ही आदेश जारी करू, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणी शुक्रवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….