‘शिक्षण’ हे सर्व समस्यांवरील पर्याय दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्यात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे प्रतिपादन…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 16 नोव्हेंबर :- शिक्षण हे सर्व समस्यांवरील पर्याय आहे, शिक्षणामुळे उच्च स्तरावर जाण्यासाठी संधी निर्माण होतात. त्यामुळे आपली स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी विद्यार्थीजीवनात भरपूर अभ्यास करावा, सोबतच अवांतर वाचनातून चांगले विचार व आदर्श आत्मसात करावे व परिस्थितीवर मात करून चांगले नागरिक बनावे, असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज विद्यार्थ्यांना केले.
जिल्हा बाल संरक्षक कक्ष यांचेतर्फे बालगृहातील इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी जिल्हाधिकारी येडगे बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी ज्योती कडू, बालकल्याण समितीचे अध्यक्ष सुनिल घोडेस्वार, उपाध्यक्ष अमित सरोदे, डॉ. माणिक मेहरे, राम हळदे, प्रा. माणिक मेहरे, बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजुरकर इ. प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांनी महान व्यक्तींची आत्मचरित्रे वाचावी व त्यांचे आदर्श घेवून आपणालाही समाजाला दिशा देणारे सुजाण नागरिक बनता यावे, यादृष्टीने अभ्यासातून प्रयत्न करावे. वाईट गोष्टींपासून दूर राहून स्वत:ला चांगल्या सवयी लावणेदेखील आवश्यक असल्याचे ते म्हणाले. कुठल्यातरी उच्च पदावर जाणे, संपत्ती मिळविणे ही यशस्वीतेची व्याख्या नसून आपल्याला जे पाहिजे ते बनने, प्रामाणिकपणे मार्गक्रमण करणे, आनंदी राहणे व आपले स्वप्न पुर्ण करणे ही यशाची व्याख्या असल्याचेही त्यांनी सांगितले. जेष्ठ विद्यार्थ्यांनी नवीन विद्यार्थ्यांना चांगल्या मार्गावर जाण्यासाठी मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी ज्योती कडू, सुनिल घोडेस्वार, अमित सरोदे व प्रा. माणिक मेहरे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कौतुक सोहळ्यात इयत्ता दहावीच्या पल्लवी सोयाम, आदिती पाटील, सज्जाद शेख, देविका कदम, मिनाक्षी रायपलवर, कोमल गेडाम, रोहण राठोड, विशाल राठोड, आतिश राठोड, वीरेंद्र जाधव, गणेश पवार, समाधान राठोड, दत्ता राठोड, रोहित राठोड, देवानंद गायकवाड, विवेक जाधव, रोहिणी राठोड, दीक्षा खंडारे, आरती तावरे, प्रलय सेजव, आदित्य गायकवाड, महेंद्र तायडे रुद्रेश मेश्राम यांना तर इयत्ता बारावीच्या समेध कांबळे, सुमित कांबळे, सुनील कांबळे, शुद्धोधन कांबळे, प्रज्वल घुगरे, गोपाल पवार, रणजीतकुमार राठोड, श्रावण चव्हाण, सलोनी राठोड यांचा गुलाबपुष्प व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. तसेच ‘महात्मा गांधींच्या विचारांची गरज’ या विषयावर घेण्यात आलेल्या निबंधस्पर्धेतील विजयी विद्यार्थी योगश्री तोडसे, आदिल अली, गौरी राठोड, कृष्णा राठोड, श्वेता मदीकुंटावार, प्रतिक्षा पवार यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला महिला व बाल कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी, बालगृहातील अधिकारी व विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी इ. प्रामुख्याने उपस्थित होते.