हवामानाचा अंदाज देवून शेतकऱ्यांचे संरक्षण करणार : पंजाब डख ; १४ ते १९ नोव्हेंबर दरम्यान पावसाचा अंदाज
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख :९६३७८८६७७७
महागाव :
लहापणापासूनच शेतकरी पुत्र असल्याने शेतकऱ्यांना पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी धडपड सुरू आहे.बऱ्याच नैसर्गिक अभ्यासातून अंदाज खरा ठरू लागला आहे.येत्या १४ ते १९ नोव्हेंबर दरम्यान पावसाचा अंदाज आहे.अशी माहिती खाजगी हवामान तज्ञ पंजाब डक यांनी शेतकऱ्यांना दिली.स्व.उत्तमराव नरवाडे यांच्या स्मृतीपित्यर्थ शेतकऱ्यांना आगामी हंगाम आणि उत्पादन वाढीसाठी शेतकरी संवाद मेळावा घेण्यात आला यावेळी ते बोलत होते.
प्रास्ताविकतेत जगदीश नरवाडे म्हणाले की ,शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला समोर जाण्यासाठी आणि येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकजूट आवश्यक आहे.सर्वच क्षेत्रात एकजूट आहे. मात्र शेतकऱ्यांत एकजूट नसल्याने शेतकरी माघारला जात आहे.शेतकऱ्यांसोबत मी सदैव आहे असे त्यांनी सांगितले.पुढे बोलताना हवामान तज्ञ पंजाब डक म्हणाले की,
मुंबई येथे कोसळणाऱ्या मान्सून पावसाच्या सरी त्याचा अंदाज बांधून शेतकरी खरीप पिकांची पेरणी करत होते.मात्र मागील काही वर्षांत शेतकऱ्यांचा अंदाज चुकू लागला.त्याला कारणीभूत बलाढ्य कारखानदार आणि वाढती वृक्षतोड ठरू लागली.वाढत्या प्रदूषणाने हवामानाच्या बदलाने मान्सून गुजरात कडे पलायन करू लागले.मुंबईतील कोसळणारा मान्सून पाऊस पेरणीनंतरही महाराष्ट्रात दाखल होत नसल्याने शेतकऱ्यांचे होत्याच नव्हतं झाल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला, दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने अनेक शेतकऱ्यांनी अनुभवले.मागील काही दिवसात मी दिलेला अंदाज तंतोतंत खरा ठरू लागला याचे उत्तम उदाहरण मागील काही दिवसात शेतकऱ्यांनी अनुभवले.शेतकऱ्यांच्या भेटीगाठी ने मी शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज देवून संरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे.शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नका मी आता पावसाचा अंदाज ८ ते १० दिवस आधीच देणार आहे.शेतकऱ्यांनी शक्यतो सोयाबीन परभणी विद्यापीठाची ६१२ ही जात निवडावी.ही जात पावसात तग धरू शकते.त्यामुळेच सोयाबीन पिकाच्या उत्पादनात भरघोस वाढ होणार असा विश्वास हवामान तज्ञ पंजाब डक यांनी व्यक्त केला.हरबरा पेरणी एकरी ४० किलो आणि १८ इंचावर करावी.३ एकर मध्ये ७५ क्विंटल च्या वर उत्पादन घेण्याच्या क्षमता शेतकऱ्यांत आहे.आणि ते मी स्वतः पंजाब डक यांनी करून दाखविल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ.सुभाष आपेट यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन अभय बोंपिलवार तर आभार माजी सभापती डॉ.बी.नाईक यांनी मानले.
टायगर फायटर वृषालीचा सत्कार :
नुकतेच महागाव तालुक्यातील करंजखेड येथील वृषाली हिच्यावर शेतात असताना वाघाने हल्ला केला.तिने आपला गळा वाघाच्या जबड्यात असताना हातातील हंड्याने त्याच्यावर प्रहार केल्याने वृषाली मृत्यूच्या दाढेतून परत आली. तीच्या ह्या धाडसाचे कौतुक करावे म्हणून तिला शौर्याची ट्रॉफी देवून
हवामान तज्ञ पंजाब डक , वनस्पती रोग शास्त्रज्ञ सुभाष आपेट , जनआंदोलन संघर्ष समितीचे अध्यक्ष जगदीश नरवाडे यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला