शेतकरी बांधवांना पटवून दिले जलशुध्दीकरण चे महत्व
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख :७२४९४४४८८८
महागाव :
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय उमरखेड चा विद्यार्थांनी ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत ग्रामस्थांना जलशुध्दीकरण चे महत्व पटवून देतानाच जलशुद्धीकरण बाबत प्रत्याशिकातून प्रशिक्षण दिले .
यावेळी कृषी महाविद्यालय उमरखेड ्चा कृशिकण्या कु. पल्लवी मनवर , प्राजक्ता खंदारे , तेजस्विनी धोंगडे , प्रियंका लोखंडे यांनी पिण्याचा पाण्याचे शुध्दीकरण कसे करावे याबाबत प्रत्यक्षीत करून दाखविले. पावसाळ्यात गावातील पिण्याचा पाण्याचे मुख्य स्त्रोत असलेल्या विहिरीमध्ये दूषित पाणी जमा होत असते. आणि दूषित पाण्यामुळे साथीचे अनेक रोग पसरतात. ही समस्या उद्भवू नये म्हणून पाण्याचे शुध्दीकरण आवश्यक असल्याने कृशिविद्यार्थिनी ग्रामस्थांना पटवून दिले. हा कार्यक्रम उमरखेड येथील विहिरीवर करण्यात आला
या प्रसंगी कृषी महाविद्यालय चे प्रा. एस.के. चींताले ,प्रा. आनंद राऊत ,
प्रा. वाय. एस. वाकोडें सर व ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी प्रा. सपकाळ सर यांचे मार्गदर्शन लाभले.