मराठवाडा वॉटर ग्रीड च्या पहिल्या टप्प्याला तत्वत: मंजुरी ; जायकवाडी उजनी शाश्वत स्त्रोतातून पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा ; लातूर बीड औरंगाबाद जिल्ह्यांना होणार लाभ
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
राजकीरण देशमुख,नांदेड :-
लातूर, बीड औरंगाबाद जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या मराठवाडा वॉटर ग्रीड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीत तत्वत: मंजुरी देण्यात आली असून राज्य मंत्रिमंडळाची त्यास लवकरच मान्यता मिळणार आहे.
मराठवाड्यातील पाणीप्रश्न कायमचा सोडवण्याच्या दृष्टीने मंत्रालयात संबंधित विभाग व मराठवाड्यातील मंत्र्यांची उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, बैठकीदरम्यान मराठवाडा वॉटर ग्रीड या प्रकल्पांच्या कामाला गती देण्याची विनंती मी केली होती.
राज्याचे पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील,सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे तसेच जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख, रोहयो फलोत्पादन मंत्री ना.संदिपान भुमरे या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनीही सदरील मागणीला पाठिंबा देत हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा अशी भूमिका मांडली. चर्चेअंती मराठवाडा वॉटर ग्रीड या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला तत्वतः मंजुरी देण्यात आली.
या प्रकल्पामुळे मराठवाड्याची खूप जुनी मागणी मान्य झाली आहे. जायकवाडी, उजनी या शाश्वत स्त्रोतामधून औरंगाबाद, बीडसह लातूर जिल्ह्यासाठी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…