कृषी निविष्ठाचा काळाबाजार करणा-यांवर कडक कारवाई करा ; जिल्हाधिका-यांचे कृषी विभागाला निर्देश…
कृषी निविष्ठाचा काळाबाजार करणा-यांवर कडक कारवाई करा ; जिल्हाधिका-यांचे कृषी विभागाला निर्देश….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 29 :- शेतक-यांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्याला आवश्यक असलेले बियाणे, खते, किटकनाशक आदींचे सुक्ष्म नियोजन कृषी विभागाने करावे. तसेच कृषी निविष्ठांचा काळाबाजार होणार नाही, याबाबत दक्ष राहून काळाबाजार करणा-यांवर कडक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगाम 2021 मध्ये कृषी निविष्ठांच्या नियोजनासाठी जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर पोलिस अधिक्षक खांडेराव धरणे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जि.प.कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे आदी उपस्थित होते.
आढावा बैठकीमध्ये आवश्यक बियाणे व खते, याबाबत महिनानिहाय नियोजनाबाबत चर्चा झाली. तसेच शेतकऱ्यांना अप्रमाणित कृषी निविष्ठांचा पुरवठा होणार नाही, याबाबत दक्ष राहावे. तसेच कृषी निविष्ठांची परिणामकारक गुणवत्ता तपासणी होण्यासाठी आणि खरीप हंगामात कृषी निविष्ठांच्या संदर्भात तक्रारी येऊ देऊ नका. शेतकऱ्यांना पुरवठा होणाऱ्या कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेसाठी जिल्ह्यामध्ये स्थापन केलेल्या 17 भरारी पथकापर्यंत तपासणी कराव्यात व अनधिकृत बियाणे व खतांबाबत कायद्यानुसार कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
अवैधरित्या अनधिकृत कापूस बियाण्यांची (एचटीबीटी) वाहतूक, वितरण, विक्री व साठवणूक होवू नये याकरीता भरारी पथकांपर्यंत तपासण्या करून कारवाई करावी. कृषी निविष्ठांचा काळाबाजार करणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे सक्त निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. तसेच खरीप हंगाम 2021 मध्ये शेतकऱ्यांनी पेरणीसाठी राखून ठेवलेले घरचेच सोयाबीन बियाणे वापरण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन केले.
बैठकीला महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक अशोक ठाकरे, जिल्हा पणन अधिकारी अर्चना माळवे, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापक श्री. गावंडे, कृषी विक्रेता संघाचे अध्यक्ष संजय पालतेवार आणि सचिव कमल बागडे उपस्थित होते.
००००००००

पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या ठाणेदारांवर निलंबनाची कारवाई करा ; महागाव तालुका पत्रकार संघाचा आंदोलनाचा इशारा….
राज्यात गारपिटीचा हाहाकार..! 12 जिल्ह्यांमध्ये संकट, थेट ऑरेंज अलर्ट, पुढील…
“शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा, शेतमालाला हमीभाव द्या”: हर्षवर्धन सपकाळांची मागणी, सरकारवर टीका….
राष्ट्रवादीत काय चालले आहे..? अविश्वासाचे वातावरण आणि नेतृत्वाचा संघर्ष….
संकटाची परिस्थिती हीच संधी ; लोकांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरा….
‘५० खोके’ला ५० ‘ठोसे’ने उत्तर; शिंदेसेनेला साथ देत भाजप नेत्यांचा विरोधकांना इशारा….