आघाडी सरकार पाच वर्ष टिकणार ; राष्ट्रवादीला विश्वास
खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशनिश्चितीनंतर व्यक्त केला विश्वास
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांपेक्षा अधिक काळ चालेल, असा विश्वास जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. भाजपाचे ज्य़ेष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्यावर त्यांनी या पत्रकार परिषदेत अधिकृतरित्या जाहीर केलं. यावेळी पत्रकारांच्या विविध प्रश्नांनी त्यांनी उत्तर दिली.
राज्यातील सरकार पडेल असं विरोधी पक्षांकडून बोललं जात आहे. याबाबत पाटील यांना पत्रकारांनी विचारणा केली यावर उत्तर देताना ते म्हणाले, “महाविकास आघाडीचं सरकार हे केवळ पाचच वर्षे टिकणार नाही तर त्यापेक्षा अधिक काळ ते चालेल” आपल्या या उत्तराद्वारे त्यांनी खडसेंसह भाजपाच्या अनेक आमदारांच्या राष्ट्रवादीत येण्यामुळे सरकार अधिकच मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला.
“महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षे चालेल, यात कसलीही शंका नाही. मी तर अनेक वेळा म्हणालोय की, हे सरकार दीर्घकाळ चालेल. पाच वर्ष ही कमी मुदत आहे. पण, बडेजाव करणार नाही. गेल्या काही दिवसात भाजपाच्या वेगवेगळ्या भागातील नेत्यांशी माझी चर्चा झाली आहे आणि त्यांची देखील राष्ट्रवादीत येण्याची इच्छा आहे. ते ज्या वेळी येतील, त्यावेळी कळेल. आपण अंधारात प्रवेश घेणार नाही. दिवसाढवळ्या घेणार आहोत,” असं सांगत जयंत पाटील यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….