इसापूर धरणाचे 9 दरवाजे उघडले;नदीपात्रात 432.49 क्युमेक्स इतका विसर्ग
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
स्वप्नील चिकाटे : ९९७०५३५९८८
ढाणकी :
ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे त्यामुळे धरण पूर्णता 97 टक्के तू भरले आहे सोमवारी दिनांक 14 सप्टेंबर सकाळी 3 वाजता दोन, सकाळी 8 वाजता एक, सकाळी 10 वाजता दोन , दुपारी 1वाजून 30 मिनिटांनी दोन दुपारी 3 वाजता तीन असे एकूण 9 दरवाजे 50 सेंटिमीटर ने उघडण्यात आले आहे पैनगंगा नदीपात्रात 432.49 क्युमेक्स इतका विसर्ग सोडण्यात आला आहे
पैनगंगा नदी पात्रांमध्ये 432.49 क्युमेक्स इतका विसर्ग सोडण्यात आला आहे कळमनुरी, उमरखेड, हादगाव, हिमायतनगर, पुसद ,किनवट, माहूर, महागाव या नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आव्हान देण्यात आले आहे ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प उपविभाग क्रमांक 1 पैनगंगानगर पूर नियंत्रण कक्ष इसापूर प्राप्त माहितीनुसार ईसापुर धरण दिनांक 13 सप्टेंबर रोजी 21 वाजता उपयुक्त पाणीसाठा 935.4460 द.ल.घ.मी. आहे .पाणी पातळी 440.70 मी. आहे एकूण धरण 97.02 टक्के भरले आहे आज 14 सप्टेंबर रोजी धरणाचे दरवाजा क्रमांक 7, 2, 8, 9, 14,6, 10,5, व 11 एकूण 9 दरवाजे 50 सेमिने उघडण्यात आले असून पैनगंगा नदीपात्रात 432.49 क्युमेक्स इतका विसर्ग सोडण्यात आला आहे
यावर्षी बुलढाणा वाशिम व हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू होती पाऊसही या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होता त्यामुळे पाणलोट क्षेत्राच्या इसापूर धरणाच्या वरच्या भागातील लहान-मोठे बंधारे व धरण भरल्याने त्यातील अतिरिक्त जलसाठा नदीपात्रात सोडण्यात आल्याने ईसापुर धरण 97 टक्के भरले आहे.
2006 नंतर ईसापुर धरण पूर्ण क्षमतेने यावर्षी भरले आहे असा अंदाज संबंधित अधिकाऱ्यांनी नोंदवला आहे कयाधू व मारलेगाव या नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग पाहून धरणाचे पाणी पैनगंगा नदी पात्रात सोडण्यात यावे जेणेकरून 2006 मध्ये काही नदीकाठच्या गावांना स्थलांतरित करण्याची परिस्थिती निर्माण झाली होती आज ती वेळ नदीकाठच्या नागरिकांवर येता कामा नाही अशी पूर्वसूचना उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर येथील नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्याला केली आहे
इसापूर धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे किंवा कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येईल. व नदी काठावरील किंवा पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी बिनतारी संदेशानुसार कळविण्यात आल्याची माहिती ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष अधिकारी यांनी दिली
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास धरणाचे दरवाजे उघडावे लागणार आहेत. यामुळे नदी काठावर असलेल्या गावांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. या साठी नदी काठच्या गावांतील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हिंगोली नांदेड यवतमाळ* जिल्ह्यातील आपत्ती निवारण कक्षास सतर्क राहून परिस्थितीवर लक्ष देण्यास खासदार हेमंत पाटील 22 ऑगस्ट रोजी पूर्व व माहिती सांगितले आहे.