राज्यात मुलांना पळवल्या जातायेत; ३० टक्क्यांनी प्रमाण वाढले, राज ठाकरेंची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे चिंता व्यक्त….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “सध्या राज्यात बेपत्ता मुलांच्या संख्येत वाढ झाली असल्याची माहिती आहे. हाच मुद्दा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उचलला आहे. सध्या राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अशातच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज्यातील बेपत्ता होणाऱ्या मुलांच्या वाढत्या संख्येवर प्रकाश टाकला.
तसेच त्यांनी चिंता व्यक्त केली. या पत्रातून त्यांनी, लहान मुलांना पळवून लावून भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्यीय टोळ्या सक्रिय झाल्याचा आरोप केला आहे.
राज ठाकरेंनी पत्रात म्हटलं की, ‘ एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, २०२१ ते २०२४ या काळात लहान मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले होते. राज्यातील मुलांचे अपहरण नेमके कसे होते? राज्यात कोणती टोळी सक्रीय आहे? यावर सरकारने तातडीने लक्ष घालून कृती करावी’, अशी अपेक्षा राज ठाकरेंनी पत्राद्वारे व्यक्त केली. तसेच ‘रस्त्यावरील भिकारींची मुले, हे त्यांचीच आहेत का? याचाही तपास केला पाहिजे’, अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी राज ठाकरेंनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांना आवाहन केलं आहे. ‘विधीमंडळात या गंभीर विषयावर चर्चा होणं गरजेचं आहे. तसेच या मुद्द्यावर प्रशासनाला ठोस पावले उचलण्यास भाग पाडावे’, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. ‘पुरवणी मागण्या मंजूर न करता, या विषयावर चर्चा व्हावी’, अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, ‘केंद्र सरकारनेही या विषयाबाबत सगळ्या राज्यांशी चर्चा करून कृतीगट तयार करायला हवा. सध्या वंदे मातरम या विषयावर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही’, असा थेट हल्लाबोल यावेळी त्यांनी केला.
‘आज राज्यातील लहान मुलं बेपत्ता होत आहेत. राज्यातील जमिनी पळवल्या जात आहेत. या विषयांवर विधिमंडळात चर्चा व्हावी. यावर एकमुखाने पावलं उचलून प्रशालनाला भाग पाडावं, असं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का?’, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, राज ठाकरेंच्या पत्राला मुख्यमंत्र्यांकडून काय प्रतिसाद देण्यात येतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..