महाराष्ट्रावर ‘मोंथा’ चक्रीवादळाचं संकट ; IMD चा मुसळधार पावसाचा अंदाज….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मान्सून महाराष्ट्रातून परत गेलाय. पण पावसाने मात्र अद्याप काढता पाय घेतलेला नाही. दिवळीमध्येही मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. पूर परिस्थितीतून सावरणाऱ्या महाराष्ट्रावर आता मोंथा चक्रीवादळाचे संकट घोंगावत आहे.
अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात वाऱ्याने कमी दाबाचा पट्टा तयार झालाय, त्यामुळे पुढील ४८ तास राज्यात धो धो पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आळा आहे. मुंबई, पुण्यासह राज्यात अनेक जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आलाय.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होतेय. या चक्रवादळाला थायलंडने ‘मोंथा’ हे नाव सुचवलेल आहे. मोंथा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुंबई, पुण्यासह राज्यातील काही जिल्ह्यांत पुढील ३८ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मोंथा चक्रीवादळ वेगाने आंध्र प्रदेशच्या किनारी भागाकडे सरकत आहे. पण याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार असल्याचा अंदाज वर्तवलाय. त्याशिवाय आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यांना रेड अलर्ट देण्यात आलाय.
महाराष्ट्रात पावसाची शक्यता कुठे ?
यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात महाराष्ट्रात पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. किनारी भागात सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार,मोंथा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पुढील ४८ तासांत पुण्यासह राज्यभरात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे.’मोंथा’ चक्रीवादळामुळे देशातील अनेक राज्यात पावसाचे संकट आलेय. महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईतही काही भागांत पावसाचा अंदाज आहे.तर पूर्व विदर्भाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..