राहुल गांधी यांच्याविरोधात आसाममध्ये एफआयआर, राजकीय स्टंट असल्याची काँग्रेसची टीका….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
गुवाहाटी :- “काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कथितरित्या देशाच्या सार्वभौमत्त्वाला धोका निर्माण होईल अशी टिप्पणी केल्याचा आरोप करून आसाममध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अॅड. मोनजित चेतिया यांनी पानबाजार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
काँग्रेस मुख्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान राहुल गांधी यांनी ”काँग्रेसला केवळ भाजप आणि संघाशी नाही तर त्यांनी ताब्यात घेतलेल्या सरकारी संस्थेचाही सामना करायचा आहे, आपल्याला राज्य यंत्रणांशी लढा द्यायचा आहे,” असे वक्तव्य केले होते. राहुल यांनी देशविरोधी वक्तव्य केल्याचा आरोप भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केला होता. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही तक्रार राजकीय स्टंट आहे अशी टीका आसाम विधानसभेतील विरोधी पक्षनेते देबब्रत सैकिया यांनी केली. दरम्यान, २०१९च्या लोकसभा निवडणूक प्रचारात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीबद्दल राहुल गांधी यांच्याविरोधात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्याच्या कार्यवाहीला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्थगिती दिली.
‘सरसंघचालकांनी माफी मागावी’
नवी दिल्ली : सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वातंत्र्य चळवळीबद्दल केलेल्या देशविरोधी विधानाबद्दल माफी मागावी या मागणीचा काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक्सवरील पोस्टमध्ये पुनरुच्चार केला. राम मंदिर बांधले त्याच दिवशी देशाला खरे स्वातंत्र्य मिळाले, १५ ऑगस्ट १९४७ रोजी मिळालेले स्वातंत्र्य राजकीय होते, असे विधान भागवत यांनी केले होते.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….