धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर! मनोज जरांगे गावात दाखल, मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बीड :- “धनंजय मुंडेंचा निकवटर्तीय वाल्मिक कराडला खुनाच्या गुन्ह्यात आरोपी करावं, यासह विविध मागण्यासाठी मस्साजोगचे गावकरी आक्रमक झाले आहेत. गावकरी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करीत आहेत.
गावात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली असून मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील गावात दाखल झाले आहेत.
गावात दाखल होताच मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय देशमुख यांना फोन लावला आणि टाकीवरुन खाली येण्याचं विनवणी केली. ”तुम्ही खाली या, तुमची गरज आहे आम्हाला. सगळा समाज तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही खाली या, माझी विनंती आहे. तुम्हाला काय झालं तर त्यांचं जगणं अवघड करेन.” असं मनोज जरांगे म्हणाले.
मस्साजोगमध्ये गावकरी मोठ्या संख्येने टॉवर परिसरामध्ये दाखल झाले आहेत. एक महिना लोटला तरी या प्रकरणातील सर्व आरोपी अटक झालेले नाहीत. मुख्य सुत्रधारावर खुनाचा गुन्हा दाखल नाही. कराडवर खुनासह मोक्कांतर्गत कारवाई करावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.
यासह या प्रकरणाची केस उज्ज्वल निकम यांच्याकडे देण्यात यावी, हीदेखील मागणी आहे. सरकारने अद्याप यावर निर्णय घेतलेला नाही. आठवड्याभरापूर्वी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकम यांना फोन लावला होता. त्यांनी दोन दिवसांत कळवतो असं सांगितलं होतं. परंतु अजूनही त्याबाबत काहीही कार्यवाही झाली नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.
दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, अंबादास दानवे, संभाजीराजे छत्रपती, संदीप क्षीरसागर यांनी मागितला आहे. त्यासाठी या नेत्यांनी राज्यपालांचीही भेट घेतली होती. परंतु सरकारने काहीही निर्णय घेतलेला नाही. उलट अजित पवार हे धनंजय मुंडे यांना पाठिशी घालत असल्याचं दिसत आहे. त्यांचं नाव या प्रकरणात कुठेच नाही, असं पवार म्हणत आहे. परंतु सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांप्रमाणे मुंडेंचा सरकारी बंगला सातपुडा येथेच आवादा कंपनीच्या खंडणीची डील झाली. तरीही मुंडेंच्या बाबतीत सरकार कारवाई करत नसल्याचं दिसतंय.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….