शरद पवारांच्या आमदाराची जीभ घसरली; म्हणाले, “धनंजय मुंडे पुरुष वेश्या…”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील काही आमदारांकडून होत आहे. पण, पुरावा नाही, तोपर्यंत राजीनामा घेणार नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतली आहे.
मात्र, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) आमदार उत्तमराव जानकर यांची जीभ घसरली आहे.
धनंजय मुंडे हे पुरुष वेश्या असलेले मंत्री आहेत. असे मंत्री सरकार चालवत असतील, तर राज्यानं काय घ्यायचं? असा सवाल उत्तमराव जानकर यांनी उपस्थित केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
उत्तमराव जानकर म्हणाले, “धनंजय मुंडेंचा राजीनामा पहिल्याच दिवशी घ्यायला पाहिजे होता. राजीनामा मागण्याची गरज काय आहे? हे राज्य अगदी नैतिक होते. विलासराव देशमुख, आर. आर. पाटील यांनीही राजीनामे दिले आहेत. धनंजय मुंडेंनी रानबाजार मांडला आहे. स्त्री वेश्या पाहिल्या आहेत. पण, पुरुष वेश्या असू शकतो, हे अशा पद्धतीचे मंत्री ( धनंजय मुंडे ) आहेत. हे मंत्री सरकार चालवत असतील, तर या राज्यानं घ्यायचं काय?”
“गृहखाते जागे आणि शुद्धीवर असते तर वाल्या कोळी तयारच झाला नसता. गृहमंत्री आणि सरकारच्या आशीर्वादानं राज्यात गुंडगिरी सुरू आहे. सरकार आणि वाल्मिक कराडमध्ये तडजोडी होऊन तो पोलिसांना शरण गेला आहे. त्यामुळे घरच्यापेक्षा चांगली सोय त्याला पोलीस स्टेशनमध्ये मिळत आहे,” असा आरोप जानकर यांनी केली आहे.
“निवडणूक आयोग कार्यालयात बसून ईव्हीएम हॅक होत नसल्याचं सांगत आहे. पण, तीच मशीन दहा मिनिट माझ्याकडे द्या, काय तंत्रज्ञान आहे, तुम्ही काय घाटोळे केलेत, कशी मते चोरलीत, हे मी पुराव्यानिशी सांगतो. स्वायत्त संस्था ज्या पद्धतीनं काम करत आहेत, हे देशाला घातक आहे. सरकार ज्या पद्धतीनं या संस्थांचा वापर करत आहे, हे देखील महाभयंकर आहे. निवडणूक आयोग हा भाजपसाठी ‘वाल्या’ म्हणूनच काम करत आहे,” अशी टीकाही जानकर यांनी केली आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….