खासदार राहुल गांधी ची भारत जोडो यात्रा 14 मार्चला मोखाड्यात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मोखाडा :- काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी देशभर भारत जोडो यात्रा काढल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील भारत न्याय यात्रा सुरू आहे. ही यात्रा आता महाराष्ट्रात दाखल होत असून नाशिक, त्र्यंबकेश्वर येथुन गुरूवारी 14 मार्च ला रोजी मोखाड्यात येणार आहे.
मोरचोंडी गावानजीक आमदार सुनिल भुसारा यांच्या निवासस्थाना जवळील मोकळ्या जागेत राहुल गांधी यांचा मुक्काम असणार आहे. तर 15 मार्च ला गांधी येथील आदिवासींशी संवाद साधणार आहेत.
मोखाडा चौफुली, जव्हार शहर, विक्रमगड बाजारपेठ यानंतर वाडा येथून भिवंडी येथे मुक्कामाला जाणार आहे. मोखाडा तालुक्यातील या यात्रेच्या यशस्वीतेसाठी काॅग्रेस चे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी मोखाडा दौरा करून आढावा घेतला होता.
आमदार सुनिल भुसारा आणि काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या नेतृत्वाखाली तिन ही तालुक्यात महत्त्वाच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. तब्बल 25 हजारांहून अधिक नागरीक, या यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती आमदार सुनिल भुसारा यांनी दिली आहे.
राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी देशातील मोदी सरकारच्या फसव्या योजना व शेतकऱ्यांच्या अन्यायकारक योजना विरोधात सर्व सामान्य नागरिकांना जागृत करुन एकत्र जोडण्यासाठी भारत जोडो न्याय यात्रा काढली आहे.
याच भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून गुरूवारी 14 मार्च ला खासदार गांधी मोखाडा येथे मुक्कामी येणार असून आदिवासी बांधवाशी संवाद साधणार आहेत. तसेच चौक सभा व रॅली काढून भाजपा सरकारच्या फसव्या योजना विषयी जागृती करणार असल्याचे आमदार सुनिल भुसारा यांनी सांगितले आहे.
एकूणच या न्याय यात्रेत मोठया प्रमाणावर नागरीक सहभागी व्हावे यासाठी गावोगावी बैठका घेण्याबाबत ठरले असून भित्ती पत्रके, जनजागृती करण्यासाठी ध्वनीक्षेपक वाहने तालुक्यात खेडोपाडी फिरणार आहेत.
याचवेळी सर्व सहभागी वाहने थेट भिवंडी पर्यंत सोबत जाणार असल्याचे सांगितले जाते आहे. यावेळी काँगेस तालुकाध्यक्ष जमशीद(लारा) शेख, जिल्हा अध्यक्ष काँग्रेस आदिवासी सेल अशोक पाटील, राष्ट्रवादी पालघर जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोठेकर , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका अध्यक्ष दिलीप मोहंडकर, नगरसेवक वामन हमरे, शिवसेना शहर निखिल लोखडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.