म्हणे पुण्याला ५० कोटी देणार, तुमच्या हातात काय घंटा…? राज ठाकरेंनी जाहीर केला ग्रामपंचायतीसाठी निधी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- राज ठाकरे यांनी आज पुण्यात गणेश कला क्रिडामंडळ येथे ग्रामपंचायत सदस्य व सरपंचांचा मेळावा घेतला. यावेळी राज ठाकरे म्हणाले, मला यायला उशीर झाला यापेक्षा मी येऊच शकत नव्हतो, काल रात्री पासून अशक्तपणा आला आहे.
सकाळी माझे डोळे उघडत नव्हते. तुम्ही सगळे आला आहात म्हणून मी पाच १० मिनिटे बोलणार आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ ग्रामपंचायतीला ५ लाख रुपयाचा निधी जाहीर केला. निधीची रक्कम कमी असली तर वाढवून देऊ, अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली.
राज ठाकरे यांनी ग्रामीण भागातील प्रश्न सोडवण्याचे आवाहन सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना केले. ज्यांनी मतादन केले नाही त्यांचे देखील कामे करा, असे राज ठाकरे म्हणाले.
गावातील शहरात आणि शहरतील परदेशात जातात. का तर सभोवतालच्या वातावरण यामुळे जातात, नोकरी इकडे पण आहे तिकडे पण आहे. वातावरण गावातील चागल ठेवण हे पहिल काम करा. एका गावात गेलो होतो मी माझ्या शालेय जीवनातील भ्रष्टाचारी ग्रामपंचायत म्हणजे रामगड ग्रामपंचायत शोलेमध्ये ठाकूर आहे त्याच्या गावात टाकी आहे. पण काय टाकीवर त्याचा बाप चढवणार, त्या टाकीला पाणी कस चढवणार? असं काम मनसेकडून होता कामा नये, असे राज ठाकरे म्हणाले.
परत जाल तेव्हा विनंती आहे की ग्रामपंचायतमध्ये नागरिक यांची बैठक बोलावा आणि गाव स्वच्छ ठेवा. मनसेच्या सर्वात स्वच्छ ग्रामपंचायत असेल त्याला ५ लाखाचा निधी मी स्वतः येऊन देईन कमी वाटला तर अजून देईन. यांच्यासारखे पुण्याला ५० कोटी देणार, असं बोलले. यांच्या हातात काय आहे घंटा…आवाक्यात असेल ते बोला आणि लोकांना समाधानी ठेवा, अशी टीका राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.
राज ठाकरे यांनी राम मंदिर उद्घाटनावर देखील भाष्य केले. राज ठाकरे म्हणाले, येत्या 22 जानेवारीला राममंदिर लोकार्पण होणार आहे. त्याविषयी काही बोलणार नाही पण इतर भानगडीत पडू नका. इतकंच सांगेन की कार सेवकांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होत आहे. तेव्हा मनसेच्या सैनिकांनी कार सेवकांच्या आनंदात सहभागी व्हायचे आहे. जिथे जिथे शक्य आहेत तिथे आरत्या किंवा विविध स्वरूपाचे कार्यक्रम इतरांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने साजरे करा.