“उद्धव ठाकरेंना सावरकरांच्या जयंतीचा विसर, भाजपने दोन फोटो ट्विट करत साधला निशाणा”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- काल देशभरात वीर सावरकर यांची १४० वी जयंती साजरी करण्यात आली. दिल्लीतील महाराष्ट्र भवनात राज्य सरकारच्या वतीने जंयतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. परंतु या कार्यक्रमासाठी सदनातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे इतरत्र हलवण्यात आल्याने मोठा वाद उफळून आला आहे. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्य सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. तर दुसरीकडे भाजपने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
काल वीर सावकरांच्या जयंतीनिमित्ताने समाज माध्यमांवर सगळ्या राजकीय नेत्यांनी जयंतीच्या शुभेच्छा दिल्यात. यातच बीजेपी महाराष्ट्राने याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा फोटो ट्विट केला आहे. त्यात उद्धव ठाकरे दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या फोटोला अभिवादन करतांना दिसत आहेत. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, काॅंग्रेसला खुश करण्यासाठी उद्धव ठाकरे यांची लाचारी. गांधी परिवारांची जयंती करणाऱ्यांना स्वातंत्र्यवीर सावकरांच्या जयंतीचा पडला विसर अस म्हणत भाजपने उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी न्यायाची स्थापना करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही विश्वव्यापी कर्तृत्वांचे पुतळे हटवून अपमान करणे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही. हे करत असताना सर्वसामान्यांचा अभिमान असणारी महाराष्ट्र शासनाची मुद्रा झाकली जात आहे. याचे भान देखील सरकारला राहिले नाही. नेहमी गोंधळ घालणारे बोलघेवडे आता गप्प का? या घटनेचा निषेध करण्याची हिम्मत दाखवतील का ? असा सवाल रोहित पवारांनी केला आहे.