भारतीय संविधान बदलण्याचे मनसुबे हाणून पाडा :- जितेंद्र आव्हाड…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- सम्राट अशोक, महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त आयोजित धम्म क्रांती प्रज्ञा पर्व 2023 चे आज माझी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. खराब वातावरणामुळे आव्हाडांचे विमान नागपूर विमानतळावर उतरू शकले नाही त्यामुळे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपली उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार इंद्रनील नाईक होते.
सुरवातीला सुजाता महिला मंडळ व यशोधरा महिला मंडळ यांनी बुद्ध वंदना घेवून कार्यक्रमाची सुरवात झाली.
भारतीय संविधान ही बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेली अमूल्य देणगी आहे. भारतीय संविधानाला अभिप्रेत असेलेल भारतीयत्व हिच आमची ओळख आहे. देशात ज्या पद्धतीचे वातावरण सध्या निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या वातावरणात बाबासाहेब आंबेडकर हेच सर्वाधिक प्रासंगिक आहेत.धर्मनिरपेक्ष, समता मूलक समाज हेच आमच्या चळवळींचे उद्दिष्ट असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भाषणातून प्रतिपादित केले.
बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे राष्ट्र निर्माते आहेत. समाजातील सर्व स्तराच्या उन्नतीचा मूलमंत्र बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे. बाबासाहेब आंबेडकर हे सर्व महिलांचे आणि सर्व वंचित समाजाचे उधरकर्ते आहेत असे प्रतिपादन आमदार इंद्रनील नाईक यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून केले. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. प्रशांत वासनिक प्राचार्य डेअरी टेक्नोलॉजी कॉलेज पुसद, आत्माराम धाबे, आदिवासी प्रकल्प अधिकारी पुसद यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विचारपीठावर तहसीलदार एकनाथ काळपांडे, गट विकास अधिकारी, संजय राठोड, अर्जुन लोखंडे, देवेंद्र खडसे, अविनाश भगत, भीमराव कांबळे, विठ्ठल खडसे, अशोक भालेराव उपस्थित होते.
बुध्दीश्ट इंटरनॅशनल स्कूल पुसद येथील विद्यार्थी यांनी नृत्य सादर केले.
प्रज्ञापर्वाचे अध्यक्ष किशोर कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, निवेदन अंबादास वानखडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रज्ञापर्वाचे कार्याध्यक्ष नत्थुजी
वाहुळे यांनी केले. भंते डॉ. खेमधममो महाथेरो यांच्या धम्म देसणेने कार्यक्रमाचा समारोप झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, नारायण ठोके, महेश हबर्डे, नितेश खंदारे, संतोष गायकवाड, प्रफुल भालेराव, विष्णू सरकटे, परमेश्वर खंदारे, प्रीतम आळणे, राजू पठाडे, समाधान केवटे, जगदीश सावळे, मुन्ना. हाटे, संजय वाढवे, प्रा. सुनील खाडे, विकास मनवर, साहेबराव गुजर, सुरेश कांबळे, बाळासाहेब कांबळे, अंबादास कांबळे, मधुकर सोनोने, दिनेश सावळे,रंगराव बनसोड आदी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले…