‘अजितदादा बोलतात गोड पण कार्यक्रम सुरू असतो’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार टोलेबाजी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस सुरू आहे. आजच्या दिवसाच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पोलीस भरती, बारावी परीक्षेतील पेपरफुटीवर प्रश्न उपस्थित केले.
यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली.
‘अजितदादा तुम्ही गोड बोलता पण तुमचा कार्यक्रम सुरू असतो. अशी पोटदु:खी सुरू राहुदे, यासाठी आम्ही जालीम औषध ठेवले आहे. यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला आहे, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना लगावला.
यावेळी अजित पवार यांच्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी जोरदार टोले लगावले. “सत्तांतर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत म्हणून आम्हाला धक्का बसला राज्यपाल कोश्यारीही अवाक झाले असंही अजितदादा भाषणात म्हणाले. पण, तुम्ही २०१९ मध्ये साखर झोपत शपथ घेतली. मी तेव्हा सकाळी टीव्ही लावली तेव्हा धक्का बसला. तो खरा आमच्यासाठी मोठा शॉक होता त्यातील अनेक कथा देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितल्या आहेत, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अजित पवार यांना लगावला.
“तुम्ही आम्हाला घटनाबाह्य सरकार म्हणता मग तुम्हीही घटनाबाह्य विरोधी पक्षनेता आहात का?, असा सवालही एकनाथ शिंदे यांनी केला. अजितदादा आता शिवसेनेचे प्रवक्तेही झाले आहेत. कडवट कट्टर तुम्ही बनू नका, असा टोलाही शिंदे यांनी लगावला. (Maharashtra Budget 2023)
एकदा ठरवा मुख्यमंत्री कोण होणार
काही दिवसापूर्वी मुंबईसह पुण्यात बावी मुख्यमंत्रिपदाचे बॅनर लावले होते, हे बॅनर विरोधी पक्षनेते अजित पवार आणि जयंत पाटील यांचे लावले होते, यावरुनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात टोले लगावले. “जयंत पाटील आणि अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्रिपदाचे बॅनर लावले आहेत, ते अगोदर ठरवा कोण होणार मुख्यमंत्री. सगळ्या बॅनरची साईज सेमच आहे, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….