३८ हजार शिक्षकांची नियुक्ती ; साडेतीन लाख आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आल्यापासून देशातील शिक्षणव्यवस्थेत बदलाचे वारे वाहात आहेत. त्यामुळे यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातून शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळेल अशी आशा शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्वांनाच आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना शिक्षण क्षेत्रासाठी मोठी घोषणा केली आहे. येत्या काळात ३८ हजार ८०० शिक्षकांची नियुक्ती सरकार करणार आहे. तसेच साडे तीन लाख आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी एकलव्य शाळांची निर्मिती केली जाणार आहे.
खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना संशोधनासाठी प्रोत्साहन
देशाच्या विकासासाठी शिक्षक महत्त्वाचे. शिक्षकांना प्रशिक्षणासाठी विविध योजना
लहान मुलं आणि शाळकरी मुलांसाठी नॅशनल डिजिटल लायब्ररीची स्थापना केली जाईल. विविध विषयांची पुस्तके उपलब्ध होतील.
नॅशनल बुक ट्रस्टच्या माध्यमातून अभ्यासक्रमेतर ज्ञानासाठी साहित्य उपलब्ध करणार.
वयानुसार पुस्तके उपलब्ध करून देणार.
३८८०० शिक्षकांची नियुक्ती. एकलव्य शाळांच्या माध्यमांतून साडे तीन लाख आदिवासी मुलांसाठी शिक्षण.