लोकसभेची आज निवडणूक झाली तर कोणाचे सरकार…? केजरीवाल…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- सी-व्होटरच्या सहकार्याने ‘मूड ऑफ द नेशन’ सर्वेक्षण केले आहे, ज्यामध्ये एनडीए सरकारच्या कामकाजाबाबत देशातील लोकांची मनस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
जानेवारी 2023 मध्ये झालेल्या या सर्वेक्षणात एकूण 1 लाख 40 हजार 917 लोकांनी भाग घेतला. तसेच अनेक ज्वलंत मुद्द्यांवर आपली मते मांडली.
तुम्ही मोदी सरकारच्या एकूण कामगिरीवर किती समाधानी आहात, आज लोकसभा निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाचे सरकार स्थापन होईल, तुम्हाला एनडीए सरकारचे सर्वात मोठे यश आणि अपयश काय वाटतं? असे प्रश्न विचारण्यात आले.
दरम्यान एनडीए सरकारचे काम लोकांना आवडल्याचं चित्र आहे. 67 टक्के लोकांनी खूप चांगले आणि 11 टक्के लोकांनी एडीएच्या कामगिरीला चांगले म्हटले. तर 18 टक्के लोकांनी वाईट म्हटले आहे. 20 टक्के लोकांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईतील कामगिरी मोदी सरकारचे सर्वात मोठे यश असल्याचं सांगितलं. तर 14 टक्के लोकांनी कलम 370 हटवने, 11 टक्के लोकांनी राम मंदिर उभारणी आणि 8 टक्के लोकांनी जनकल्याण योजना यशस्वी झाल्याचे म्हटलं आहे.
मोदी सरकारचे सर्वात मोठे अपयश? या प्रश्नावर २५ टक्के लोकांनी महागाई सांगितली आहे. तसेच बेरोजगारी 17 टक्के लोकांनी तर ८ टक्के लोकांनी कोविड-19 चा सामना करताना मोदी सरकारला अपय़श आल्याचं म्हटलं. तसेच विकासदरातील अपयश ६ टक्के लोकांनी दर्शवलं आहे.
विरोधी पक्ष काँग्रेसची कामगिरी
विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसच्या कार्यपद्धतीबाबतही जनतेला विचारण्यात आले आहे. यामध्ये 19 टक्के लोकांनी ते खूप चांगले, 15 टक्के लोकांनी चांगले, 19 टक्के लोकांनी सरासरी आणि 25 टक्के लोकांनी खराब म्हटलं आहे.
भारत जोडोबाबत लोकांना काय वाटत?
भारत जोडो यात्रेबाबतही लोकांनी आपली मते नोंदवली. 29 टक्के लोकांनी जनतेशी संपर्क साधण्याचा हा चांगला निर्णय असल्याचे म्हटले आहे. 37 टक्के लोकांनी पक्ष मजबूत करण्यासाठी ठीक असल्याचे म्हटले आहे. 13 टक्के लोकांनी राहुल गांधींची प्रतिमा सुधारण्यासाठी पावले उचलल्याचे सांगितले आहे. त्याचवेळी 9 टक्के लोकांनी पक्षाला काही फरक पडणार नसल्याचे सांगितले.
काँग्रेस पक्षात सुधारणा कोण आणू शकेल?
या प्रश्नाच्या उत्तरात 26 टक्के लोकांनी राहुल गांधींचे नाव घेतले आहे. 16 टक्के लोकांनी सचिन पायलट, 12 टक्के लोकांनी मनमोहन सिंग, 8 टक्के लोकांनी प्रियंका गांधी आणि 3 टक्के लोकांनी मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव घेतले आहे.
विरोधी पक्षाचा चांगला नेता कोण असू शकतो?
या प्रश्नाच्या उत्तरात २४ टक्के लोकांनी अरविंद केजरीवाल, २० टक्के ममता बॅनर्जी, १३ टक्के राहुल गांधी आणि ५ टक्के नवीन पटनायक यांचे नाव सुचवले आहे.
कोणाला किती जागा?
या प्रश्नाला उत्तर देताना लोकांनी पुन्हा एनडीएचे सरकार स्थापन करण्याचे संकेत दिले आहेत. एनडीएला 298, यूपीएला 153 आणि इतरांना 92 जागा मिळण्याची शक्यता आहे. मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचे झाल्यास, एनडीएला 43, यूपीएला 29 आणि इतरांना 28 टक्के मते मिळण्याचा अंदाड आहे.
आज लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, या प्रश्नावर लोकांनी आपली मते दिली. भाजपला 284, काँग्रेसला 68 आणि इतरांना 191 जागा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचे झाल्यास, भाजपला 39 टक्के, काँग्रेसला 22 आणि इतरांना 39 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.
एनडीएला कोणत्या राज्यात फायदा होतोय?
या प्रश्नाच्या उत्तरात आसाममध्ये 14 पैकी 12, तेलंगणात 6, पश्चिम बंगालमध्ये एकूण 42 पैकी 20 जागा मिळू शकतात, असे सांगण्यात आले. यूपीमध्ये एकूण 80 पैकी 70 जागा मिळू शकतात.
यूपीएचा फायदा कोणत्या राज्यात लाभ?
कर्नाटकात यूपीएला 17 जागा मिळू शकतात. महाराष्ट्रातही मोठे यश मिळताना दिसत आहे. यावेळी येथे 34 जागा मिळू शकतात. तर बिहारमध्येही युपीएला मोठं यश मिळण्याचा अंदाज आहे. बिहारमध्ये युपीएला 25 जागा मिळण्याचा अंदाज आहे.